ऑनलाईन टीम / मुंबई :
अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून 32 घरे गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या 36 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले असून, अद्याप 50 नागरिक बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच या गावाच्या पुनर्वसनाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानंतर काही वेळातच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली असल्याची मोठी घोषणा केली.