31 डिसेंबरच्या पाटर्य़ांनी शिवारात अस्वच्छता, शेतकऱयांना त्रास
बेळगाव / प्रतिनिधी
दरवषी 31 डिसेंबरच्या रात्री मोठय़ा प्रमाणात पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. विशेष करून तरूणांचे प्रमाण अधिक आहे. यादिवशी मासांहारी जेवणाला पसंती दिली जाते. गुरूवारी रात्री ग्रामीण भागात अधिक प्रमाणात तरूणांनी पाटर्य़ांचे आयोजन केले होते. शिवारातच मद्य ढोसून रिकाम्या बाटल्या, पत्रावळय़ा, प्लास्टिक पिशव्या, ग्लास, त्याचठिकाणी फेकून देण्यात आल्या आहेत. परिणामी शिवारातच अस्वच्छता पसरल्यामुळे शेतकऱयांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरवर्षी या प्रकारात वाढ होत असून पोलीसांनी समज द्यावी अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी पाटर्य़ाना महत्त्व दिले जाते. या पाटर्य़ा सर्रास ग्रामीण भागातील रस्त्यालगत असलेल्या शिवारात होतात. यावेळी शिवारातच मद्य ढोसून रिकाम्या बाटल्या, पत्रावळय़ा, प्लास्टिक पिशव्या, ग्लास फेकण्याचे प्रकार दरवषी घडतो. परिणामी शिवारात अस्वच्छता निर्माण शेतकऱयांच्या पायांना इजा होण्याचा धोका असतो. दरवषी 31 डिसेंबरच्या रात्री मोठय़ा प्रमाणात पाटर्य़ा करून मद्यपान करणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष करून तरूणांचे प्रमाण अधिक आहे.
रब्बी हंगामासाठी शेतकऱयांची लगबग सुरू असून शिवारात कडधान्य बटाटे, व भाजीपाला लागवडीसाठी धडपड सुरू आहे. मात्र जेवणानंतर प्लास्टिक व उर्वरित टाकावू वस्तुंची विल्हेवाट लावण्याऐवजी शिवारातच टाकण्यात आल्याने शेतकऱयांना याचा त्रास सोसावा लागत आहे. शिवारात काम करताना शेतकऱयांच्या पायांना काचा लागून इजा होण्याची शक्मयता आहे. रिकाम्या बाटल्या शिवारात फोडून टाकल्यामुळे काचेचा चुरा इतरत्र विखुरला गेला आहे. त्यामुळे शेतकऱयांना शिवारात फिरणे धोक्मयाचे बनले आहे. प्रशासनाने ठोस पावले उचलून तळीरामांना समज द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.