ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला अमेरिकेत पुन्हा अटक करण्यात आली आहे. त्याचे भारतात प्रत्यार्पण केले जाण्याची शक्यता असून, त्यासंदर्भात आवश्यक कागदोपत्री तयारी केली जात आहे.
मुंबईत 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट राणाने रचला होता. लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील विविध ठिकाणांवर हल्ले केले होते. यामध्ये अमेरिकी नागरिकांसह 166 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये पोलिसांनी 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते. तर अजमल कसाबला जिवंत पकडण्यात यश आले होते. त्यामुळे पाकिस्तानविरोधात सबळ पुरावे भारताच्या हाती लागले होते.
मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली राणाला 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. राणाची शिक्षा 2021 मध्ये संपणार होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच राणाला तुरुंगातून सोडण्यात आले होते. मात्र, अमेरिकेच्या प्रशासनाने त्याला पुन्हा लॉस अँजेलिस शहरातून अटक केली आहे. राणा भारताच्या हाती आल्यास भारताला पाकिस्तान विरोधी कारवाई करता येणार आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाच्या हालचालींना वेग आला आहे.