वार्ताहर/ खानापूर
सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजा, सरकारच्या लोकोपयोगी योजना, शेतीविषयक कागदपत्रांची पडताळणी, रेशन कार्ड नोंदणीसह सब रजिस्ट्रर नोंदणीपर्यंतचे सर्व कामकाज चालणारा तालुक्मयातील केंद्रबिंदू म्हणजे तहसील कार्यालय होय. परंतु गेल्या पन्नास दिवसाच्या लॉकडाऊन काळात खानापूर मिनी विधानसौधमधील तहसीलदार कार्यालय परिसर गर्दीअभावी सुन्न अवस्थेत दिसून येत आहेत. दिवसभर गजबजणारा तहसीलदार कार्यालयाचा हा परिसर महामारीच्या काळानंतर मात्र लोकांअभावी ठणठणाट दिसतोय. कोरोना महामारीच्या धास्तीने दबलेल्या सर्वसामान्य नागरिकांनीही शासकीय कामासाठी कार्यालयाकडे पूर्णतः पाठ फिरवली आहे. त्यामुळे खानापूर तहसिल कार्यालय म्हणजे निर्जन वस्ती बनली आहे.
एरव्ही दैनंदिन गरजेचा लागणारा सातबारा असो किंवा शेतीविषयक नोंदणी कागदपत्र, सरकारच्या संध्या सुरक्षा, विधवा पेन्शन, अंगविकल पेन्शन योजना असो, या सर्व सुविधा मिळवून देण्याचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही पाठ फिरवली आहे. याशिवाय तहसीलदार कार्यालयातील सब रजिस्ट्रर नोंदणी कार्यालयही गेल्या पन्नास दिवसापासून बंद आहे. याठिकाणी जमिनीच्या खरेदी विक्री नोंदणीसह विवाह नोंदणी केली जाते. सध्या लग्नसराईचा मोसम आहे पण नोंदणी कामकाज बंद आहे. त्यामुळे लग्नाच्या बाहुल्यावर चढणाऱया अनेकांचा हिरमोड झाला आहे. अनेकांनी विवाहाची रजिस्ट्रर नोंदणी लग्न प्रक्रिया पार पाडण्याचा उद्देश समोर ठेवला असला तरी सरकारने ऑनलाईन नोंदणी कार्यालयही बंद ठेवले आहे. त्याचप्रमाणे मिनी विधानसौधमधील सर्व्हे ऑफिस तसेच रेशन कार्डचे कामकाजही बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे मिनी विधानसौध परिसरात नेहमी गजबजणारा नागरिकांचा रेठा पूर्णतः ठप्प झाल्याने मिनी विधानसौध परिसरात शुकशुकाट पसरलेला दिसून येत आहे.
कृषीखात्याकडे शेतकऱयांची गर्दी
तालुक्मयातील सर्व शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरलेला असला तरी अन्नदाता शेतकऱयांच्या गरजू भातपेरणीसाठी लागणाऱया बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषीखात्याकडे मात्र शेतकऱयांची गर्दी दिसून येते. या खरीप हंगामाचा मौसम सुरू झाला आहे. शेतवाडीत लागणारी यंत्रे उपकरणे खरेदीसाठी शेतकऱयांची लगबग सुरू झाली आहे. शिवाय पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी पेरणीच्या धांदलीत आहेत. यामुळे भात बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱयांची कृषीखात्याकडे गर्दी होताना दिसते. कृषी खात्याकडून विविध प्रकारची भात बियाणे सवलतीच्या दरात त्यांना उपलब्ध केले आहेत. याचा तालुक्मयातील शेतकरी लाभ घेत आहेत..