प्रतिनिधी /सातारा :
सातारा शहर व उपनगरात तसेच तालुक्यात कोरोना – 19 चा वाढता प्रभाव पाहता सातारा तहसिलदार तथा अध्यक्षा आपत्ती व्यवस्थापन कमिटी पूर्णपणे अपयशी ठरलेल्या आहेत. त्यांच्या या निष्काळजीपणामुळे सर्व सामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तरी त्यांची बदली त्वरीत करुन या ठिकाणी कार्यक्षम तहसिलदार देण्यात यावा, अशी मागणी युवा राज्य फौडेशन चे अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी सातारा जिल्हाधिकारी, राज्यपाल, मुख्यमंत्री, महसूल मंत्री, मुख्य सचिव ( आपत्ती व्यवस्थापन ), विभागीय आयुक्त पुणे, पोलीस अधिक्षक, सातारा, यांचेकडे लेखी निवेदनाने केली आहे .