अभिनेता सैफ अली खानच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सैफ अली खानने त्याच्या ‘तान्हाजी : द अनंसंग वॉरिअर’ सिनेमावर चर्चा करताना देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. तान्हाजी चित्रपटात इतिहासाचा चुकीचा अर्थ लावून चित्रण केल्याची गंभीर टिपण्णी अभिनेता सैफ अली खानने केली आहे.
तान्हाजी चित्रपटात सैफने मुघलांचा सेनापती उदयभान राठोडची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीत सैफ अली खानने यावर भाष्य केलं आहे.
सैफ म्हणाला, इतिहासाचा चुकीचा अर्थ लावून तान्हाजी रंगवला जात होता, याची मला माहिती होती. पण व्यावसायिक यशासाठी अशा पद्धतीचा लोकप्रिय आणि चुकीचा ऐतिहासिक संदर्भ दिला जातो. उदयभानाची भूमिका खूपच आव्हानात्मक आणि मजेदार होती. त्यामुळे आपण ती स्वीकारली.