बेंगळूर : वेल्लारु आणि गुंडारु नद्या कावेरीला जोडण्याबरोबरच या नदीचे अतिरिक्त पाणी तामिळनाडूला वापरू देणार नाही, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले आहे. त्यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला पत्र पाठविले असून नदीजोड प्रकल्प सुरू करण्यास तामिळनाडूला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. पाटबंधारेमंत्री रमेश जारकीहोळी, कायदा-संसदीय कामकाजमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुक्रवारी ऍडव्होकेट जनरल प्रभूलिंग नावदगी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच कायदेतज्ञांशी चर्चा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बसवराज बोम्माई म्हणाले, कावेरी नदीचे अतिरिक्त 45 टीएमसी पाणी तामिळनाडू विविध योजनांसाठी वापरण्यासाठी सरसावले आहे. याविरोधात न्यायालयात आक्षेप घेण्यात येईल. अतिरिक्त पाणी उभय राज्यांमध्ये वाटप झालेले नाही. असे असताना देखील तामिळनाडूने कर्नाटकाच्या हिताविरोधात कावेरीचे अतिरिक्त पाणी अन्य कारणांसाठी वापरण्याची योजना आखली आहे.
Previous Articleविश्रुत स्ट्रायकर्स, डीके लायन्स संघ विजयी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.