ऑनलाईन टीम / चेन्नई :
तामिळनाडूतील मदुराईत लॉकडाऊन आदेशाचे तीन-तेरा वाजवत एका बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक एकत्र जमले होतेे. याप्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी तीन हजार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मदुराईचे जिल्हाधिकारी टी जी विनय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन असताना 12 एप्रिलला मदुराईत एका बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो जण एकत्र जमले होते. पोलिसांनी याप्रकरणी अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या तीन हजार जणांविरोधात लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अंत्यसंस्काराचे फोटो आणि व्हिडिओ पाहून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.