वृत्तसंस्था / चेन्नई :
रणजी क्रिकेट स्पर्धेतील होणाऱया आगामी मुंबई आणि रेल्वेविरूद्धच्या सामन्यासाठी तामिळनाडू संघाची घोषणा करण्यात आली असून बाबा इंद्रजीतचा समावेश करण्यात आला आहे.
इंद्रजीत पूर्ण तंदुरूस्त असल्याने त्याचा रणजी संघात समावेश करण्याचा निर्णय गुरूवारी तामिळनाडूच्या निवड समितीने घेतला. तामिळनाडू आणि मुंबई यांच्यातील रणजी सामना 11 जानेवारीपासून तर तामिळनाडूचा रेल्वे संघाबरोबरचा सामना 19 जानेवारीपासून खेळविला जाईल. तामिळनाडूने यावर्षीच्या रणजी स्पर्धेत चार सामन्यांतून चार गुण मिळविले असून त्यांना पुढील सामनें बाद फेरी प्रवेशासाठी जिंकणे जरूरीचे आहे. तामिळनाडू संघाने नव्या क्रिकेट हंगामात समाधानकारक कामगिरी करताना विजय हजारे करंडक स्पर्धा आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे.