ऑनलाईन टीम/तरुण भारत
तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन झालं आहे. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बेंगळूर येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. दुर्घटनेत बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी फक्त वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बधुवारी त्यांचं निधन झालं.