ऑनलाईन टीम / दिसपूर
अफगाणवर तालीबानने कब्जा केल्यांनंतर त्याच्यावर जगभरातून निषेध केला जात असला तरी भारतातील काही ठीकाणातून तालिबानचे समर्थन केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश, दिल्ली, आसामसह काही राज्यात यासंदर्भात सोशल मिडीयावर या समर्थनार्थ पोस्ट केल्या जात आहेत. आसाम पोलीसांनी यावर कडक कारवाई करत १४ तालिबान समर्थकांना अटक केली आहे.
तालीबान्यांचे समर्थन करणाऱ्या १४ जणांच्या अटकेची कारवाई शुक्रवार रात्री पासून ही कारवाई सूरु केली असून त्यांच्यावर बेकायदेशीर क्रिया (प्रतिबंध) कायदा, आयटी कायदा आणि सीआरपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी ट्वीट केले आहे. तसेच तालीबान संदर्भात पोस्ट करताना सावधानता बाळगावी, त्यांच्या पोस्टला लाईक करताना देखील सावधानता बाधानता बाळगावी. असा इशारा दिला आहे.
आसाम पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सोशल मीडियावर सतर्क आणि देखरेख करत आहोत. मेट्रोपोलिटन, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येकी दोन जणांना अटक करण्यात आली. दरांग, कचर, हैलाकंडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजाई जिल्ह्यातून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली.