काबुल : गेला महिनाभर शांततापूर्ण वातावरण असताना आता पुन्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवरती नव्याने वाद धुमसत असताना दिसतो आहे. पाकिस्तानचे सैन्य डुरंड सीमेवर अंधाधुंद गोळीबार करत असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. अफगाणिस्तानवर सत्ता मिळवणाऱया तालिबानने पाकिस्तान सैन्याला गोळीबार थांबवण्याचा इशारा दिला आहे. जर का या सूचनेकडे दुर्लक्ष करून गोळीबार थांबवला नाही व परिस्थिती बिघडली तर त्या परिस्थितीला पाकिस्तानचे इम्रान खानचे सरकार जबाबदार असेल, असे तालिबानने म्हटले आहे. गेल्या वषी 15 ऑगस्टला तालिबानने काबुलवर कब्जा मिळवत सत्ता आपल्या हातात घेतली आहे. त्यानंतर डुरंड सीमेवर तारेच्या कुंपणावरुनचा वाद अधिकच पेटतो आहे. बुलडोजरच्या सहाय्याने तालिबानने सीमेचे कुंपण काढण्याचा प्रयत्न केला, तेंव्हापासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. त्यामुळेच तालिबान सध्या पाकिस्तान विरुद्ध संतप्त झाला आहे. या दोघांमधील वाद आता आणखी टोकाला जाईल अशी शक्मयता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.
Previous Articleचाकरमान्यांसाठी सांगली, कोल्हापुरातून 20 बसेस चिपळुणात
Next Article हस्तगत केलेला दीड कोटींचा मुद्देमाल फिर्यादेंना परत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.