प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱयांना खरीप पेरणीसाठी सोयाबिन बियाणे देण्यात आली. मात्र ही बियाणे खराब निघाली. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला. याचे पडसाद तालुका पंचायतीच्या तालुकास्तरीय बैठकीत उमटले. यावेळी लोकप्रतिनिधींनी कृषी अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. यापुढे अशी शेतकऱयांची फसवणूक होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, तसेच नुकसान झालेल्या शेतकऱयांना तातडीने नुकसान भरपाई द्या, अशी सक्त ताकीद यावेळी देण्यात आली.
तालुका पंचायतच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. या बैठकीमध्ये पावसाळा सुरू झाल्यामुळे महापुराबाबत दक्षता घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. याचबरोबर सध्या संपूर्ण देशावरच कोरोनाचे संकट आहे. यातच पावसाळय़ामध्ये बऱयाचवेळा साथीचे आजार येत असतात. तेंव्हा त्या आजाराबाबतही काळजी घेण्याची सूचना या बैठकीमध्ये करण्यात आली.
सध्या पावसाने दमदार सलामी दिली आहे. याचबरोबर अजूनही मोठे पाऊस होण्याची शक्मयता आहे. तेंव्हा मागीलवर्षाप्रमाणे जनतेचे हाल होऊ नये यासाठी काळजी घ्या, असे अधिकाऱयांना सांगण्यात आले. खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे. जवळपास 50 टक्के पेरणी शेतकऱयांनी पूर्ण केली आहे. मात्र शेतकऱयांना देण्यात येणारी बियाणे योग्य प्रतीची नाहीत. सोयाबिन उगवले नसल्यामुळे शेतकऱयांना दुबार पेरणी करावी लागत आहे. यामध्ये पैसा आणि वेळ वाया जातो. कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱयांना या संकटाशी सामना करावा लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेंव्हा अशाप्रकारे घटना घडू नये यासाठी दक्षता घ्या, असे सांगण्यात आले.
कोरोनामुळे जनता तणावाखाली आहे. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे साथीचे आजारही डोके वर काढण्याची शक्मयता आहे. तेंव्हा आरोग्याधिकाऱयांनी त्याची प्रथमच काळजी घ्यावी. साथीचे आजार पसरु नये याबाबत प्रत्येक ग्राम पंचायतीला दक्ष राहण्याची सूचना करावी, असे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, रमेश गोरल, माधुरी हेगडे, सिंधू सुणगार, तालुका पंचायत उपाध्यक्ष मारुती सनदी, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्यासह जिल्हा पंचायतमधील अधिकारी आणि तालुका पंचायत कर्मचारी आणि तालुक्मयातील अधिकारी उपस्थित होते..