पावसामुळे लागवडीसाठी पोषक वातावरण : शेतकऱयांना आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरणारे पीक : योग्य हमीभाव मिळेल या आशेवर लागवड
आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्मयात मुसळधार पाऊस झाला. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तालुक्मयात रताळी वेल लागवड जोमाने सुरू झाली आहे. बेळगावची रताळी ही खाण्यासाठी स्वादिष्ट व चविष्ट असतात, यामुळे इथल्या रताळय़ाला मागणीही मोठय़ा प्रमाणात असते. गतवषी रताळय़ाला म्हणावा तसा दर मिळाला नाही. किमान यंदा तरी योग्य हमीभाव मिळेल, या आशेवर शेतकरी रताळी लागवड करताना दिसू लागले आहेत.
रताळी हे पीक कंदमुळाचा प्रकार असून वेलीपासूनच रताळय़ाची लागवड करण्यात येते. शेतकऱयांना आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरणारे हे पीक असून अलीकडे रताळी लागवड करण्याकडे शेतकऱयांचा कल अधिक आहे. गेल्या वषी बेळगावच्या मार्केट यार्डमध्ये रताळय़ाला सरासरी प्रतिक्विंटल 500 ते 1000 रुपये असा दर मिळाला होता. मात्र, हा दर आम्हाला परवडणारा नाही, असे शेतकऱयांचे म्हणणे आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून रताळय़ाला योग्य हमीभाव मिळाला नसल्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे इतर भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे.
खरीप हंगाम साधण्यासाठी शेतकऱयांची लगबग चालू झाली आहे. तालुक्मयाच्या काही भागात रताळी हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते. मुसळधार पावसामुळे रताळी लागवड करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकऱयांची शिवारात रताळी वेल लागवडीची धांदल दिसून येऊ लागली आहे.
काळसर किंवा लाल मातीच्या जमिनीत ट्रक्टरच्या साहाय्याने बांध (मेरा) तयार करण्यात आलेल्या आहेत. या बांधावर शेणखत व रासायनिक खत घालण्यात येत आहे. रताळी वेल लागवड करण्याआधी बांधावर शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने किंवा माणसाने कोळपणी करतात. कोळपणी केल्यानंतर वेल लागवड करण्यासाठी सोपे जाते. ट्रक्टरने बांध तयार करण्यासाठी तासाला 500 रुपये इतके भाडे देण्यात आले आहे. लागवड करण्यासाठी एका मजुराला प्रतिदिन दीडशे रुपये मजुरी देण्यात येत आहे. या मजुरीमध्ये काही भागात फरकही
आहे.
रताळी लागवड करण्यासाठी साधारण एप्रिल महिन्यात वेलींची बियाणासाठी लागवड केली जाते. सध्या काही मोजक्मयाच शिवारात वेल लागवडीकरिता सज्ज झाली असल्यामुळे वेलीचा दर यंदा वाढलेला आहे. येत्या पंधरा दिवसांनंतर लागवडीसाठी वेल अधिक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. पावसामुळे शिवारातील भुईमूग पेरणी व बटाटा लागवड ही कामे खोळंबली असून केवळ रताळी लागवड सुरू असल्याने काही शेतकरी रताळी वेल विकत घेऊनही लागवड करताना दिसत आहेत.
बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, कुदेमनी, बेळवट्टी, इनाम बडस, बिजगर्णी, कावळेवाडी, जानेवाडी, कर्ले, बहाद्दरवाडी, किणये, बामनवाडी, बाळगमट्टी, उचगाव आदी भागात रताळी लागवड करण्यात येत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे शिवारातील अनेक पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला
आहे.
एकरी 20 हजार रुपये खर्च
खरीप हंगामातील रताळी लागवडीसाठी ट्रक्टरच्या साहाय्याने बांध (मेरा) तयार करणे, शेणखत व रासायनिक खत घालणे, लागवड, भांगलण, खताचा डोस व मजुरी आदी मिळून एकरी 20 हजार रुपये इतका खर्च येत असल्याची माहिती काही शेतकऱयांनी दिली. सध्या खताच्या किमतीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे कर्ज काढूनच लागवड करावी लागत असल्याची माहितीही काही उत्पादक शेतकऱयांनी दिली.
रताळी वेलीपासून रताळय़ाची लागवड करण्यात येते. वेलीचे पाच ते सहा इंच या प्रमाणात वेल तोडून त्याची बांधावर दोन ओळीत लागवड करण्यात येते. पूर्वी ही लागवड तीन ओळीने करण्यात येत होती. मात्र, त्यासाठी वेळ अधिक लागत होता. यामुळे आता सर्रास दोन ओळीची लागवडच करण्यात येऊ लागली आहे.
तालुक्मयाच्या पश्चिम भागासह खानापूर परिसरातही रताळी पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. या पिकावर अनेक शेतकऱयांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे रताळय़ाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न होण्याची गरज आहे.
वेलीची लागवड केल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी खताचा दुसरा डोस द्यावा लागतो. त्यानंतर भांगलण करावी लागते. साधारण दसऱयापासून रताळी काढणीला सुरुवात होते. दिवाळीत ही काढणी जोमाने सुरू असते.