मजुरांच्या तुटवडय़ामुळे शेतकऱयांची वाढली चिंता : भाताचे दर गडगडल्याने शेतकऱयांना फटका ; कृषी खात्याच्या कारभाराविषयी नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
तालुक्मयात सुगी हंगामाला जोरदार सुरूवात झाली असून, बळीराजा सुगी हंगामात गुंतल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. भात कापणी झालेल्या शिवारात भात जमा करणे, भाताची गंजी घालणे यासह भात शिवारात कडधान्यांची पेरणी करताना दिसत आहे. मागील आठवडय़ात ढगाळ वातारणामुळे सुगी हंगामात क्यत्यय निर्माण झाला होता. मात्र शेतकरी पुन्हा एकदा सुगी हंगामाकडे वळला आहे. परंतु रविवारी पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱयांची धावपळ सुरू झाली आहे.
तालुक्मयात भात कापणी झालेल्या शिवारात विशेष करून कडधान्यांची पेरणी केली जाते. तर काही शिवार उन्हाळी बटाटा व भाजीपाला लागवडीसाठी शिल्लक ठेवले जाते. सध्या सुगी हंगाम सगळीकडे एकदम सुरू असल्याने मंजुराचा तुटवडा जाणवत आहे.
तालुक्मयातील कडोली, बंबरगे, अलतगे, आंबेवाडी, गोजगा, हंदिगनूर, येळळूर, निलजी, बसवाण कुडची, कणबर्गी, अष्टे, कंग्राळी बुद्रुक, चलवेनहट्टी, मंडोळी, सावगांव, बेळगुंदी, बाकनूर, बडस, बिजगर्णी, कावळेवाडी, कल्लेहोळ, कोनेवाडी, बाची, तुरमुरी, कुदेमानी, अतिवाड, उचगाव बसुर्ते, बेकिनकेरे आदी भागात सुगी हंगामाला जोर आला आहे. शिवारात रब्बी हंगामातील हरभरा, मसूर, वाटाणे, ज्वारी आदी कडधान्यांची पेरणी करताना शेतकरी दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शिवारात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे पाणथळ शिवारात पाणी साचून राहिल्याने कापणी लांबणीवर पडली होती. आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पाणथळ शिवारातीलही भात कापणी करताना दिसत आहेत. ट्रक्टरच्या सहाय्याने मळणी करण्याबरोबर नैसर्गिक वारा नसल्यामुळे काही शेतकरी यंत्राच्या सहाय्याने भात वारे देताना दिसत आहेत. तालुक्यात विशेष करून दोडगा, बासमती या पारंपारिक बियांणाबरोबर सुधारीत इंद्रायणी, आमन, सोनम, शुंभागी, एंटाण, मनिला आदी जातींच्या बी-बियाणांचे उत्पादन घेतले जाते.
मळणी झाली मात्र भात विक्रीचे काय?
सगळीकडे सुगी हंगामाला सुरूवात झाली असून मळणीची कामे देखील सुरू आहेत. मात्र ऐन सुगी हंगामात भाताचे दर कमी झाल्याने शेतकरी चिंतातूर बनले आहे. सर्रास शेतकरी मळणी झाल्यांनतर उत्पादीत भात पिकांची खळय़ावरच विक्री करतात.
हमीभाव ठरविण्याची मागणी
मात्र यंदा भाताचे दर एकदम कमी झाल्याने शेतकरी अडचणी आले आहेत. त्यामुळे कृषी खात्याने तातडीने हमीभाव ठरवून शेतकऱयांच्या भाताची चढय़ा दराने उचल करावी, अशी मागणी होत आहे.
रयत संपर्क केंद्रातून रब्बीतील आवश्यक बी-बियांणे देण्याकडे दुर्लक्ष
रब्बी हंगामासाठी कृषी खात्याकडून आवश्यक बी-बियांणे उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी अधिक पैसे माजून ती खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्मयातील रयत संपर्क केंद्रे कुचकामी ठरली आहे. परिणामी शेतकऱयांना कडधान्य जादा पैसे माजून घ्यावी लागत असल्याने कृषी खात्याच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त होत आहे. कृषी खाते खरीप व रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱयांना सर्व बी-बियांणे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱयांपर्यंत काहीच पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱयांना खासगी दुकानादारांवरच अवलंबून राहावे लागते. हे दरवषीचे चित्र आहे. सध्या रंब्बी हंगामातील कडधान्य जमवा-जमवीसाठी शेतकऱयांची धडपड सुरू असली तरी कडधान्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांची कडधान्याअभावी गैरसोय होताना दिसत आहे. त्यामुळे कृषी खात्याच्या कारभाराविषयी शेतकरी वर्गांतून नाराजी व्यक्त होत आहे.