वार्ताहर/ किणये
गेल्या आठवडय़ात चार दिवस झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने उघडीप दिल्यामुळे शिवारात खरीप हंगामाची धांदल सुरू झाली आहे. भात व भुईमूग पेरणी आदी कामे करण्यात शेतकरी मग्न आहेत. तसेच बटाटा व रताळी लागवड करण्यासाठी मशागतीची कामे सुरू आहेत.
रविवार दि. 7 पासून मृग नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. तालुक्मयाच्या सर्रास भागात मृग नक्षत्राच्या प्रारंभी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शिवारामध्ये बऱयापैकी ओलावा निर्माण झाला. यामुळे आता खरीप हंगाम साधण्याची लगबग चालू आहे. मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केल्यामुळे चार दिवस खरीप हंगामाची कामे खोळंबली होती. हा पाऊस असाच सुरू राहिल्यास खरीप हंगाम साधावा कसा, याची चिंता शेतकऱयांना लागून राहिली होती. मात्र, शुक्रवारी व शनिवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरणीची कामे जोमाने सुरू आहेत.
शनिवारी सकाळपासूनच शिवारात कुरीच्या साहाय्याने भातपेरणी सुरू होती. तसेच काही ठिकाणी बैलजोडीच्या साहाय्याने पेरणी चालू आहे. बासमती, इंद्रायणी, इंटाण, माधुरी व इतर नवीन जातीच्या भाताची पेरणी करण्यात येत आहे. पश्चिम भागात रताळी वेल लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. त्यासाठी ट्रक्टरने बांध तयार करण्यात येत आहेत. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात पश्चिम भागातील बेळगुंदी परिसरात काही शेतकऱयांनी रताळी वेल लागवड केली. मात्र हा हंगाम मोजक्मयाच शेतकऱयांनी साधला. अजूनही बहुतांश शेतकरी रताळी बांध तयार करतानाचे चित्र दिसत आहे. जूनच्या मध्यानंतर व जुलै महिन्याच्या प्रारंभी रताळी लागवडीला जोर येणार आहे. सध्या मात्र शेतकरी बी-बियाणांची पेरणी करण्यावर जोर देऊ लागले आहेत. तालुक्मयात भात, भुईमूग, नाचणा, बटाटा, रताळी, ऊस आदी पिके प्रामुख्याने घेतली जातात.
शेतकरी संभ्रमावस्थेत
लॉकडाऊनमुळे भाजीपाला शिवारात पडून राहिला. त्याला मार्केट उपलब्ध झाले नाही. त्यामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. काजू पिकाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादित केलेल्या पिकाला योग्य हमीभाव मिळेल की नाही, याची चिंता बळीराजाला आहे. त्यामुळे बटाटा लागवड व रताळी लागवड किती प्रमाणात करायची, या संभ्रमावस्थेतही शेतकरी आहे.
शिवारातील कामांना जोरदार सुरुवात झाली असल्याने शेतमजुरांची टंचाई भासू लागली आहे. पेरणी करण्यासाठी आलेल्या मजुरांना दिवसाला 150 रुपये याप्रमाणे मजुरी देण्यात येत आहे. तसेच भातपेरणी व पेरणी केलेल्या शिवारात मशागत करण्यासाठी बैलजोडीसह एका शेतकऱयाला हजार ते अकराशे रुपये अशी मजुरी देण्यात येत आहे. तसेच ट्रक्टरने मशागत करण्याकरिता तासाला पाचशे रुपये भाडे देण्यात येत आहे. सदर दर हा पश्चिम भागातील असून भागानुसार मजुरीच्या दरामध्ये बदल आहे.