पशुपालकांनी काळजी घेण्याची गरज : वेळीच उपचार करून घेण्याचे खात्याचे आवाहन : पशुसंगोपन दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ात ‘लम्पिस्किन डिसीज’ रोगाचा पैलाव वेगाने होत असून हा संसर्गजन्य रोगाचा प्रसार इतर जनावरांना होऊ नये, यासाठी तातडीने बाधित जनावरांवर उपचार सुरू करून घ्यावेत. लागण झालेल्या जनावरांना विलगीकरण (क्वारंटाईन) करावे, असे आवाहन पशुसंगोपन खात्यामार्फत करण्यात आले आहे. रोगाची लक्षणे दिसून आल्यास तातडीने संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यातून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन खात्याने केले आहे.
तालुक्मयात हजारो जनावरांना ‘लम्पिस्किन’ची लागण झाली असून यातून बऱया होणाऱया जनावरांची संख्या अधिक आहे. बेळगावसह खानापूर तालुक्मयात रोगाची लागण अधिक झाल्याचे दिसून येत आहे. या रोगाचा फैलाव हा बाधित जनावरांपासून व डास, माशा चावल्यास व गोचीडीपासून (तांबा) होतो. लागण झालेल्या जनावरांवर वेळीच उपचार करून हा रोग नियंत्रणात आणता येतो, यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. पशुपालकांनी लागण झालेल्या जनावरांना तातडीने व खंड न पाडता सलग उपचार करून घ्यावेत, अशा सूचना करण्यात येत आहेत. या आजाराची लक्षणे एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात राज्यात दिसून आली होती. तालुक्मयात या आजाराने बाधित झालेल्या जनावरांची संख्या वाढत असून फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची काळजी घेऊन गोठा दररोज स्वच्छ करावा, तसेच जनावरांना दररोज धुवावे, लागण झालेल्या जनावरांना वेगळे ठेवण्याचे आवाहनही खात्याने केले आहे. विशेषकरून तालुक्मयातील कडोली, आंबेवाडी, जाफरवाडी, हंदिगनूर, येळ्ळूर आदी भागातील जनावरांना या रोगाची लागण अधिक झाल्याचे समोर आले आहे. हा आजार गाय, म्हैस व बैलांमध्ये दिसून येत आहे.
एकीकडे शेतकऱयाची सुगी हंगामासाठी धडपड सुरू आहे तर दुसरीकडे लम्पिस्किन रोगाने तालुक्मयात थैमान घातल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. जनावरांच्या अंगावर अचानक 2 ते 5 सें.मी. गाठी येत असल्याने दूध उत्पादक चिंतेत सापडले आहेत. काही बैलांना याची लागण झाल्याने बळीराजा शेतीतील कामे कशी करावी, या चिंतेत सापडले आहेत. खानापुरात ‘लम्पीस्किन डिसीज’ची लागण झाली होती. मात्र, ती आता आटोक्मयात येत असून पशुवैद्यकीय अधिकारी नियमित औषधोपचार करून लागण झालेल्या पशुपालकांच्या गोठय़ांना भेटी देत आहेत.
शर्यती-बाजारात आणणे टाळावे
लागण झालेल्या जनावरांना शर्यतीत नेणे टाळावे तसेच काही काळाकरिता शर्यती आयोजन करू नये, लागण झालेल्या जनावरांना बाहेर चारण्यासाठी व बाजारात विक्रीसाठी घेऊन जाऊ नये, असे आवाहन खात्याने केले आहे. शर्यती व जनावरांच्या बाजारातून या रोगाचा फैलाव वाढू शकतो, त्यामुळे शर्यती आणि बाजारात जनावरे विक्रीसाठी घेऊन जाऊ नये, असे आवहनही खात्याने केले आहे.