उद्योग खात्रीतून दुर्लक्षित तलावांकडेही लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
तालुक्मयातील तलाव सध्या अतिक्रमणाच्य्या विळख्यात अडकले आहेत. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षामुळेच तलावांच्या विकासाकडे संबंधित ग्राम पंचायतींचे लक्ष नसून तलावामध्ये मोठया प्रमाणात जलपर्णी वाढली असून गाळ ही साचला आहे. त्यामुळे ही तलावे सध्या शेतकऱयांच्या उपयोगाची नाहीत. त्यामुळे शेतकऱयांना जनावरांना सोडण्यासाठी तलावच शिल्लक नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांमधुन नाराजी व्यक्त होत आहे.
तलावांच्या सुधारणेसाठी त्वरीत उपाययोजना हाती घ्यावेत अशी मागणी आता शेतकऱयांमधून जोर धरु लागली आहे. उद्योग खात्रीातून अनेक तलावांची खोदाई करण्यात आली आहे. अनेक तलावांचा विकास व त्यामध्ये पाणी साचण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र काही तलावांकडे दुर्लक्ष झाले आहे. तलावांमधील जलपर्णी काढण्याकडे दुर्लक्ष होत असून अनेक ठिकाणी अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे याकडे अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
काही वर्षांपुर्वी या तलावाचा चांगल्याप्रकारे उपयोग व्हायचा. परंतु तालुक्मयातील अनेक ठिकाणच्या तलावामध्ये काही प्रमाणात ड्रेनेजचे सांडपाणी मिसळत असल्याने सध्या ही तलावे पुर्णपणे खराब होत आहेत. तसेच या तलावाच्या बाजूला मोठया प्रमाणात घरे बांधण्यात आली आहेत. यापैकी काहीजणांनी तलावाच्या जागेंतच अतिक्रमण केल्याचा आरोप काहीजणांमधून होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
तालुक्मयातील तलावांपैकी काही तलाव पुर्णपणे जलपर्णीने वेढला आहे. तसेच गाळ ही मोठया प्रमाणात असल्याने एखादे जनावर त्या तलावात गेल्यास ते जनावर बाहेर येऊच शकत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकरी या परिसरात जनावर सोडण्यास ही घाबरत आहेत. काही गावांमध्ये तलावाच्या पाळीवरच काही नागरिकांनी घरे बांधली आहेत. अतिक्रमण झाल्याचे दिसून येत असले तरी सर्वचजण गप्प असल्याने अतिक्रमण करणाऱयांचे फावत आहे. तलावा शेजारील अतिक्रमणे हटवून तलावाच्या स्वच्छतेचे काम हाती घ्यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.
तलावामध्ये मोठया प्रमाणात जलपर्णी व कचरा साचला होता. मात्र शेतकऱयांना जनावरांना सोडणयसाठी दुसऱया तलावाचा पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱयांची मोठी समस्या निर्माण होत आहे. अनेक शेतकरी शेती बरोबरच जोडधंदा म्हणून जनावरे ही पाळतात. अनेक ठिकाणी चागंले तलाव असूनही दुर्लक्षामुळे तलावे कुचकामी ठरले आहेत. काही तलावांमध्ये सांडपाणी जात असल्याने तलाव अस्वच्छ झाले आहेत. तलावांशेजारी राहणाऱया नागरिकांना अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आणि याचबरोबर डासांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. तलावांची स्वच्छता केल्यास नागरिकांना अतिशय चांगला उपयोग या तलावापासून होऊ शकतो. उद्योग खात्रीतून जर ही कामे केल्यास पाणी साठा होवून जमिनीत तो पाणी पातळी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देवून काम करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.