बेळगाव / प्रतिनिधी
पावसाळय़ात झालेल्या अतिपावसामुळे तालुक्यातील शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱयांना भरपाई देण्याकडे कृषी व बागायत खात्याचे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱयांतून नाराजी व्यक्त होत आहे. गतवषीही अतिपावसाचा फटका शेतकऱयांना बसला होता. दरम्यान, बागायत खात्याने नुकसान भरपाईसाठी शेतकऱयांकडून अर्ज मागविले होते. मात्र, यंदा बागायत खात्याकडून भरपाई देण्याबाबत कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी अद्याप भरपाईपासून वंचित आहेत.
गवतषी नुकसानभरपाई मिळविण्यासाठी बेळगाव तालुक्मयातून 15,872 शेतकऱयांनी बागायत खात्याकडे अर्ज केले होते. त्यापैकी 13,580 अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते. यंदा पावसाळय़ात नदीकाठावरील शिवारात पाणी साचून राहिले होते. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसला होता. त्यातच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी अडचणीत आले हेते. त्याबरोबरच यंदा खरीप हंगामातील बटाटा उत्पादकांना अधिक फटका बसला आहे. परिणामी उत्पादन कमालीचे घटल्याने बटाटा बियाणे मिळणे मुश्कील बनले आहे. गुठय़ांला 165 रुपयेप्रमाणे 1 हेक्टरला 16,500 रुपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, अद्याप शेतकऱयांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱयांनी खरीप हंगामात भात पिकाबरोबर बटाटा, भुईमूग, ऊस व रताळय़ांची मोठय़ा प्रमाणात लावगड केली होती. मात्र, अतिपावसामुळे शेतपिकांवर याचा मोठा परिणाम झाला होता. विशेषकरून बटाटा उत्पादकांना याचा अधिक प्रमाणात फटका बसला आहे. मात्र, अद्याप कोणत्याच शेतकऱयांना भरपाई मिळाली नाही. त्यामुळे तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे