ता.पं.अधिकाऱयांचे दुर्लक्ष : ग्रा.पं.मधूनही जागृती नाही : कारवाईचे नाटक करतात अशी मानसिकता
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव तालुक्मयात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. याला कारणीभूत म्हणजे प्लास्टिक. या आधी प्लास्टिक बंदीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, ते फोल ठरले. चार दिवस कारवाईचे नाटक करून अधिकारीवर्ग गप्प बसतात. त्यामुळे तालुक्मयात प्लास्टिक बंदी म्हणजे केवळ फार्स असेच दिसून येत आहे. तालुका पंचायतमधील कार्यकारी अधिकाऱयांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ग्रा.पं.च्या माध्यमातून त्यांनी प्लास्टिक बंदीसाठी प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र, एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे. याकडे जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
चार दिवस कारवाई करून अधिकारी गप्प बसतात, असे साऱयांच्याच मनात पक्के झाले आहे. प्लास्टिक मुक्तीसाठी जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. एकीकडे कचरा डेपोसाठी ग्रा.पं. व ता. पं.च्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, प्लास्टिकच बंद करण्यात आले तर कचरा होणार कसा? असा सवालही उपस्थित होत आहे. अनेक ग्रा.पं.मधून कचरा डेपोला विरोध होत आहे. अशा परिस्थितीत गावातील प्लास्टिकबंदी केल्यास आणि कार्यकारी अधिकाऱयांनी याकडे लक्ष दिल्यास सोयीचे ठरणार आहे.
ग्रा.पं.कडून जागृतीची ऐशीतैशी
‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ अशी म्हण अधिकारीवर्गाच्या कारभारामुळे रुजत आहे. तत्कालीन कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी तालुक्मयातील दुकानदारांनी प्लास्टिक बंदी करावी, अन्यथा त्यांचा व्यावसायिक परवाना रद्द करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सातत्याने ग्रा.पं.मधून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. मात्र आता याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कलादगी यांनी लॉकडाऊनआधी प्लास्टिकबंदीची मोहीम राबविली होती. प्लास्टिकमुळे अनेक ठिकाणी कचऱयाचे साम्राज्य पसरत आहे. बेळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागातही कचऱयाचे प्रमाण वाढत आहे. याला प्लास्टिकच कारणीभूत आहे. तालुक्मयातील सर्व दुकानदारांना यासाठीची नोटीस ग्रा. पं. माध्यमातून बजावण्यात आली होती. मात्र, आता कार्यकारी अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
व्यावसायिकांकडून नियम धाब्यावर
बेळगाव तालुक्मयातील कोणत्याही व्यवसायाला परवानगी न घेता अनेक दुकाने सुरू करण्यात आली आहेत. त्यांनी ग्रा.पं.कडून रितसर परवाना घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनी तो नूतनीकरण करून घेण्याची गरज आहे. इतर व्यवसायासाठी लागणारे परवाने ग्रा.पं.मधून घेण्याची गरज आहे. मात्र, अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. व्यावसायिक किंवा दुकानदार प्लास्टिक पिशवीचा वापर करत आहेत. त्यांचा परवाना रद्द करण्यात करण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज सध्या तरी दिसून येत आहे. मात्र, याकडे ता. पं. आणि ग्रा.पं.नी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर कचरा
बेळगाव तालुक्मयातील शहरालगत असलेल्या ग्रा.पं. कार्यक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक कचरा दिसून येत आहेत. सध्या काही ग्रा.पं.मध्ये घंटागाडीची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक गावात घंटागाडी फिरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. सरकारकडे तसे पत्रही पाठविण्यात येणार आहे. मात्र, नागरिकांच्या दुर्लक्षपणामुळे रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण वाढलेय. घंटागाडीत कचरा दिल्यास ते सोयीचे ठरेल. मात्र, याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. दुकानदारांनी यापुढे प्लास्टिकमधून साहित्य विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अधिकाऱयांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.