30 हजार रोपांची लागवड : सामाजिक वनीकरण खात्याचा उपक्रम, नरेगा योजनेंतर्गत खड्डय़ांची खोदाई
प्रतिनिधी /बेळगाव
पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक वनीकरण खात्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी लाखो रोपे लावून वनक्षेत्र वाढविण्यासाठी धडपड सुरू आहे. यंदादेखील सामाजिक वनीकरण खात्यामार्फत तालुक्मयातील विविध गावांमध्ये तब्बल 30 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्मयातील संपर्क रस्ते हिरवाईने फुलणार आहेत.
आजपर्यंत प्रथमच तालुक्मयात इतक्मया मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपणाची लागवड होत आहे. तालुक्मयातील वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी खात्यामार्फत हा उपक्रम राबविला जात आहे. शिवाय यासाठी उद्योग खात्री योजनेतून खड्डे काढले जाणार आहेत. तालुक्मयातील ग्रामपंचायत हद्दीतही वृक्ष होणार असून हिंडलगा, अगसगा, हंदिगनूर, केदनूर, बेनकनहळ्ळी, येळ्ळूर, के. के. कोप्प, मारिहाळ, करडीगुद्दी, काकती, होनगा, देसूर, संतिबस्तवाड आदी गावांतून लागवड करण्यात येणार आहे. परिसरातील खुली जागा, गायरान भाग, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी व संपर्क रस्त्यांवरून वृक्षारोपण होणार आहे. विशेषकरून फणस, जांभूळ, आंबा, पिंपळ, कडीपत्ता, ताड, बेहडा, निम, बदाम आदी जातींच्या रोपांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे संपर्क रस्त्यांवरदेखील प्रवाशांना विविध फळांची चव चाखता येणार आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान सावलीचा आधार मिळणार आहे.
ग्रामीण भागाला प्राधान्य
खात्यामार्फत वनक्षेत्रवाढीसाठी ग्रामीण भागात रोप लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागातील संपर्क रस्त्यांलगत रोपटय़ांची लागवड होणार आहे. त्यामुळे दरवषी तालुक्मयातील वृक्षांच्या संख्येत वाढ होणार आहे. यंदाच्या वृक्ष लागवडीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय खात्री योजनेंतर्गत खड्डय़ांची खोदाई करण्यात येणार असल्याने रोजगारांना गावात काम उपलब्ध होणार आहे. उद्योग खात्री योजनेतून खड्डे खोदण्यात येत असल्याने खात्यालाही याचा फायदा होणार आहे. गतवषी अतिवृष्टीमुळे बरीच रोपे नष्ट झाली, अशा ठिकाणीदेखील नवीन रोपे लावण्यात येणार आहेत.
सहकार्य करण्याचे आवाहन
खात्याच्या रोपवाटिकेत ही रोपे तयार करून लागवड केली जाणार आहे. नागरिकांनीही लावगड केलेल्या रोपांचे जतन क्हावे याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण खात्याचे प्रशांत जैन यांनी केले आहे.