सुनिल राजगोळकर / बेळगाव
केंद्र सरकारच्या पशुसंजीवनी योजनेंतर्गत जनावरांच्या कानांवर बारा अंकी नंबरचा टॅग (नोंदणी क्रमांक) लावण्यात येत आहे. ही अभिनव योजना पशुपालकांपर्यत पोहोचवत असतानाच कोरोनामुळे या कामाला स्थगिती मिळाली होती. मात्र अनलॉक 5 मध्ये शिथिलता देण्यात आल्याने पशुसंगोपन खात्यामार्फत पुन्हा टॅगिंगच्या कामाला सुरूवात आता होणार आहे. आतापर्यंत तालुक्मयातील तब्बल 63,575 जनावारांच्या टॅगिंगचे काम पूर्ण झाले असून अद्याप 61955 जनावरे शिल्लक असल्याची माहिती पशु संगोपन खात्याने दिली आहे. मात्र आता पशुसंगोपन खात्यासमोर कोरोना नियमाचे पालन व सामाजिक अंतर राखून टॅगिंगचे काम पूर्ण करण्याचे नवे उद्दी÷ उभे ठाकले आहे.
संपूर्ण पशुधनाची ओळख निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू असून जनावरांच्या हिताच्यादृष्टीने ही योजना राबवत आहे. ही योजना सुरू होऊन तीन वर्षे उलटली तरी अद्याप उर्वरित 50 टक्के जनावरे टॅगिंगपासून वंचित आहेत. बेळगाव तालुक्मयात 1,25,530 इतकी जनावरांची संख्या असून त्यापैकी 61,955 हजार जनावरांच्या कानांना टॅग लावण्यात आले आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून ग्रामीण भागात पशुपालनाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जनावरांची संख्याही अधिक आहे. गाय, म्हैस, बैल, शेळी, रेडा व लहान वासरांना घरो- घरी जाऊन ही मोफत सुविधा पुरवली जात आहे.
संपूर्ण पशुधनाची ओळख निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात जनावरांच्यादृष्टीने खाते चांगली क्यवस्था करत असून ही अभिनव योजना राबविण्यासाठी खाते प्रयत्नशील आहे. टॅगिंग करण्याबरोबर जनावरांची संपूर्ण माहिती ऑनलाईन पध्दतीने संग्रहीत केली जात आहे. त्यामुळे टॅग केलेल्या जनावरांची संपूर्ण माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जनावरांची एकूण संख्या किती, त्यापैकी दुभती जनावरे किती, कोणाच्या मालकीचे आहे, त्यांची उत्पादन क्षमता किती, कुठल्या भागातले आहे, कोणत्या जातीचे आहे, यासंबंधी सर्व माहिती एकत्रित मिळण्याबरोबर जनावरांची ओळख पटण्यास हा टॅग महत्त्वाचा ठरणार आहे.
सुरूवातीच्या काळात केवळ दुधाळ जनावरांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र आता सर्वच जनावरांना टॅगिंग केले जात आहे. शासनाच्या सेवा इतर सुविधा जनावरांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा टॅग महत्त्वाचा ठरणार आहे. या क्रमांकामुळे एकूण जनावरांची निद्दीष्ट संख्या समजण्याबरोबर एखाद्यावेळी जनावर चोरी गेल्यास जनावरांचा मूळ मालक समजण्यास मदत होणार आहे. या टॅगिंगबरोबर जनावरांचे वय, उंची, आहार, जनावारांच्या मालकाचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक ही सर्व माहिती ‘इनाफ’ या सॉफ्टवेअरमध्ये भरून आधारकार्डच्या धर्तीवर युनिक आयडी बनवली जात आहे. मोबाईल ऍपवर संबंधित जनावरांचा टॅग क्रमांक टाकल्यास सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
पशुपालक महाराष्ट्र गुजरात, हरियाणा आदी राज्यांतून जनावरे विकत आणतात. अशावेळी त्यांची ओळख पटण्यासाठी हा टॅग महत्त्वाचा ठरतो. आजच्या युगाला संगणक युग म्हणून ओळखल जाते आहे. या युगात अजावरांची संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने संकलित गरजेचे आहे. या उद्देश ठेवून केंद्र सरकारने ही योजना राबविली आहे. या योजनेमुळे जनावरांची संपूर्ण माहिती कोठूनही आणि केव्हाही उपलब्ध होऊ शकते.
सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांतून जनावरांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याबरोबर मोफत टॅगिंगचे करण्यात येत असून टॅगमुळे जनावरांची खरेदी-विक्री, प्रजननक्षमता, रोगप्रतिबंधक लसी, लागणारा औषध पुरवठा, कृत्रिम रेतन या बाबींची नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे आता दुभत्या जनावरांबेराबर बैल, म्हशी, गाय यांना टॅग लावणे बंधनकारक असून पशुपालकांनी सर्व जनावरे टॅग लावून घ्यावेत, असे आवाहन खात्याने केले आहे.
शहरासह ग्रामीण भागात 15 हून अधिक पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. बेळगाव मुख्य पशुवैद्यकीय दवाखान्यासह तालुक्मयात हिरेबागेवाडी, सांबरा, उचगाव, अनगोळ, के. के. कोप्प, हुदली, कडोली, संतिबस्तवाड, येळळूर, बेळगुंदी, आंबेवाडी, काकती, सुळेभावी, महांतेशनगर, वडगाव, हलगा, निलजी, नंदिहळ्ळी, किणये, आदी दवाखान्यातून ही टॅगिंग सुविधा पुरविली जात आहे.
श्रीकांत गांवी (तालुका पशुसंगोपन अधिकारी)
4 महिन्यावरील सर्व जनावरांना टॅगिंग करण्यात येणार आहे. टॅगबरोबरच जनावरांची संपूर्ण माहिती अपलोड करण्यात येत आहे. त्यामुळे जनावरांची संपूर्ण माहिती ऑनलाईन मिळण्यास मदत होणार आहे. तसेच पशुपालकांना याचा फायदा होणार आहे. पशुपालकांनी पशुसंगोपन खात्याच्या सर्व सुविधा मिळविण्यासाठी जनावरांना टॅगिंग करून सहकार्य करावे.