शिवारात वर्दळ, ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्यात बटाटा, रताळी, भुईमूग, सोयाबीन काढणीनंतर सुगी हंगामाला प्रारंभ झाला आहे. भातकापणीबरोबर मळण्यांना वेग आला आहे. त्यामुळे सर्वत्र सुगी हंगामाची धांदल सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्याचबरोबर शिवारात ताडपत्री, शेतकरी, मजूर, महिला-पुरुष यांची वर्दळ पहायला मिळत आहे.
परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर काहीशा लांबणीवर पडलेल्या सुगी हंगामाला प्रारंभ झाला आहे. कृतिका नक्षत्रानंतर सुगी हंगामाला सर्वत्र जोर आल्याचे दिसत आहे. भातकापणी, भातबांधणीबरोबर मळणींचीही धांदल सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मजुरांचा तुटवडादेखील जाणवत आहे. त्यामुळे इतर गावातून मजूर आणून सुगी हंगाम आटोपण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू झाली आहे. मात्र, अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱयांच्या चिंतेत वाढ होत आहे. मागील आठवडय़ापासून भातकापणीला वेग आला असला तरी शनिवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱयांची चिंता वाढली होती. मात्र, रविवारी पुन्हा उघडीप दिसून आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
तालुक्मयात भातपीक हे प्रमुख पीक आहे. इतर पिकांच्या तुलनेत भातक्षेत्र अधिक प्रमाणात आहे. बटाटा, रताळी, भुईमूग आणि सोयाबीन लागवडीच्या तुलनेत भातपीक अधिक आहे. मात्र, अतिपाऊस आणि परतीच्या पावसामुळे भातपिकाला फटका बसत आहे. यंदा नदीकाठी व बळ्ळारी नाल्याच्या जवळ असलेल्या भातशेतीला फटका बसला आहे. काहींनी दुबार पेरणी करून लागवड केली होती. त्या पिकांनादेखील फटका बसला आहे. तर काही ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव होऊन भातपीक खराब झाले होते. मात्र, काही ठिकाणी भातपीक जोमाने आले आहे. विशेषतः इंद्रायणी, बासमती, सोनम, शुभम, मनिला, आमन आदी जातीच्या भाताचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे बाजारात इंद्रायणी भाताला मागणी अधिक असल्याने इंद्रायणी भाताची पेरणी आणि लागवड देखील वाढली आहे. इंद्रायणी भाताचे उत्पादन अधिक होत असले तरी या भातावर किडीचा प्रादुर्भाव देखील अधिक प्रमाणात होत असल्याचे जाणकार शेतकऱयांतून बोलले जात आहे.
भातविक्री-खरेदी केंद्रे सुरू करा
भातकापणी आणि मळणीला सुरुवात झाली आहे. अलीकडे मळणी झाल्यानंतर तातडीने भाताची विक्री करतो. मात्र, दर गडगडल्याने भाताचे काय करावे, असा प्रश्न पडला आहे. साठून ठेवणे शक्मय नाही आणि दर समाधानकारक नसल्याने भातविक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने भातविक्री खरेदी केंद्रांना सुरुवात करून भाताची खरेदी करावी.
– चाळू येळ्ळूरकर, शेतकरी
भाताचा दर घसरला
एकीकडे सुगी हंगाम जोरात सुरू झाला आहे. मात्र, दुसरीकडे भातदरात घसरण झाली आहे. क्विंटलमागे 400 रुपयांनी भाताचा दर कमी झाल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. सुगी हंगामाच्या प्रारंभीच भाताच्या दरात घट झाल्याने विक्री कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. भाताच्या उत्पादनासाठी शेणखत, रासायनिक खत, मजुरी आणि इतर बाबींसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. तर दुसरीकडे वर्षभर राबून भाताला समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकऱयांतून नाराजी व्यक्त होत आहे. ऐन सुगी हंगामातच भाताचे दर गडगडल्याने भातविक्रीचा प्रश्न शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे.