तीस हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट
प्रतिनिधी / बेळगाव
वनक्षेत्र वाढविण्याबरोबर समृद्ध करण्यासाठी वनखात्याचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. दरवषी पावसाळय़ाच्या तोंडावर हजारो रोपांची लागवड केली जाते. यंदा तालुक्मयातील विविध गावांत 30 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आतापर्यंत तालुक्मयातील विविध गावात 15 हजारांहून अधिक रोप लागवड करण्यात आली
आहे.
प्रदूषण टाळण्यासाठी व पावसाचा समतोल राखण्यासाठी वनखात्यामार्फत वृक्षारोपणाची प्रभावी मोहीम राबविली जाते. या अंतर्गत जून-जुलैदरम्यान मोठय़ा प्रमाणात रोप लागवड केली जाते. आतापर्यंत तालुक्मयातील बंबरगे, केदनूर, हंदिगनूर, जुनी वंटमुरी, तारिहाळ, मास्तमर्डी, करडीगुद्दी, येळ्ळूर, के. के. कोप्प आदी गावांतून रोप लागवड करण्यात आली
आहे. नागरिकांना उपयुक्त अशा आंबा, फणस, कडीपत्ता, चिकू, लिंबू, नारळ, आदी रोपटय़ांचा लागवडीमध्ये समावेश आहे. विशेष करून खुली जागा, गायरान भाग, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, संपर्क रस्ते आदी ठिकाणी रोप लागवडीला प्राधान्य दिले आहे. शिवाय वनखात्याच्या रोपवाटिकेत ही रोपे तयार करून लागवड करण्यात येत आहेत. भविष्यात पर्यावरण आणि निसर्ग वाचविण्यासाठी खात्यामार्फत दरवषी हजारो रोपांची लागवड केली जाते. दरम्यान त्यांचे योग्य संवर्धन व्हावे, यासाठी झाडांभोवती कुंपण घातले जात आहे.
वनविभाग वृक्षसंवर्धन करून झपाटय़ाने झाडांची संख्या वाढवत आहे. तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. अशांवर अकुंश ठेवण्यासाठी वनविभागाकडून कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.