वार्ताहर/ किणये
तालुक्यात भातरोप लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाने बऱयापैकी साथ दिली असल्याने शेतकरी भातरोप लागवडीच्या कामांत व्यस्त झाला आहे. बुधवारी पावसाने उघडीप दिल्याने शिवारात खरीप हंमागाची धांदल सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पुष्य नक्षत्राच्या म्हाताऱया पावसाने तालुक्याच्या सर्वच भागात दमदार सुरुवात कली. शेतशिवारात बऱयापैकी पाणी साचले आहे. भातरोप लागवडीची कामे उरकून घेण्यात बळीराजा व्यस्त झाला आहे.
गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून तालुक्यात भातरोप लागवडीसाठी प्रारंभ झाला. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतशिवारातील पाणी आटले होते. शेतामधील पाणी कमी झाल्यामुळे लागवडीसाठी मशागत करणे अवघड बनले होते. यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने तालुक्यात बऱयापैकी हजेरी लावली आहे. यामुळे या कामांना सध्या जोर आला आहे.
बुधवारी दिवसभर कडक पडले होते. यामुळे काही शेतकऱयांची चिंता वाढली होती. अजूनही मोठा पाऊस पडायला हवा अशी शेतकऱयांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
सोमवारी तालुक्याच्या बहुतांश गावांमध्ये वार पाळणूक करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी शेतशिवारातील कामे बंद होती. मंगळवारी व बुधवारी लागवाडीची कामे करण्यात शेतकरी दंग झाला होता.
तालुक्यात सुमारे 80 टक्क्यांहून अधिक रोप लागवडीची कामे पूर्ण झाले असून उर्वरित लागवड करण्यात येत आहे.
पावर ट्रेलर व बैलजोडीच्या साहाय्याने शेतकरी शिवारात रोप लागवडीसाठी मशागत चिखल करताना दिसतो आहे. मशागत करण्यापूर्वी बऱयाच शेतकऱयांनी शिवारात शेणखत घातले आहे. काही शेतकरी रोप लागवडीच्यावेळी रासायनिक खतांचा वापर करीत आहेत.
खरीप हंगामातील इतर कामांमुळेही शेतकाऱय़ांना शेतमजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अनेक शेतकरी आपापसात शेतातील कामे उरकून घेण्यात असतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.