हजारो एकर द्राक्ष बागांचे मोट्या प्रमाणात नुकसान
संजय पाटील/हातनूर
तासगाव तालुक्यातील हातनूर सह विसापूर पेड मांजर्डे बोरगाव राजापूर सावर्डे सह संपूर्ण तासगाव तालुक्यातील हजारो एकर द्राक्ष बागांचे मोट्या प्रमाणात नुकसान बुधवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने मोट्या प्रमाणात झाले आहे. तेव्हा शासनाने पंचनामे करूनव विमा कंपन्याना आदेश देऊन विमा व नुकसान भरपाई देण्यांची मागणी केली आहे.
तालुक्यातील सावळज, डोंगरसोनी अन्य गावातही द्राक्षबागा कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसन झाले आहे. तासगाव पुर्व भागात काल रात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची झोपच उडाली आहे. द्राक्षबागायतदार शेतकरी दरवर्षी लाखों रुपये द्राक्ष पीकविमा भरतो, परंतु हे पैसे नेहमी विमाकंपणीच्या घश्यात जात आहेत, शेतकरी कधी ही याविषयी शासनाच्या दारात गेला नाही व शासनानेही विमा कंपणीकडे पाठपुरावा केला नाही, परंतु यावर्षी कालच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवली आहे, द्राक्ष उत्पादनचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल व कर्जबाजारी झाला आहे तथा होणार या भितीने नैराश्यात गेला आहे, शासनाने वेळेत पाठपुरावा करून विमा कंपन्याना आदेश देत त्वरित विमा जमा करण्याचे आदेश देण्याची मागणी होत आहे.
तासगाव तालुका द्राक्षाचे आगार म्हणून ओळखला जातो. मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने येथील शेतकऱ्यांनी द्राक्षबागा उभ्या केलेल्या आहेत. अवकाळी पावसामुळे यापुढे तासगाव तालुक्याती द्राक्ष बागा निसर्गाच्या अवकृपेमुळेकमी होतात की काय ? अशी भिती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
सध्या द्राक्ष काढणीस येऊ लागली आहेत. अशा स्थितीत पाऊस झाल्यास द्राक्ष मण्यांनातडे जाण्याचा धोका असतो, कालच्या पावसाने अनेक ठिकाणी द्राक्ष मान्यांना तडे गेलेत तर वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात द्राक्ष घड जमिनीवर तुटून पडले आहेत, बेदाणा शेडवर टाकलेला माल भिजूनही मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,याशिवाय रब्बी हंगामातील गहु हरबरा शाळू या पिकांचेही व ऊस पीक वाऱ्या मुळे आडवे झाले आहेत व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,या पिकांचाही सर्व्ह होऊन नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
त्यामुळे सध्या शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आधीच एकीकडे द्राक्षांचे भाव कोसळू लागले आहेत, व्यापाऱ्यांच्या हातापाया पडून शेतकऱ्यांना द्राक्षबागा घालवाव्या लागत आहेत अशा अवस्थेत आता निर्सगाने देखील शेतकऱ्यांना अडचणीत आणल्याने सध्या शेतकऱ्यांची अवस्था आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशीच झाली आहे