पुणे / प्रतिनिधी :
निसर्ग चक्रीवादळ येत्या तासाभरात दक्षिण अलिबागच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हे वादळ अलिबागच्या दक्षिणेला ६० किमी अंतरावर असून, वादळाच्या उजव्या बाजूने रायगड जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यानंतर पुढील ३ तासात या वादळाचा प्रभाव राहणार आहे. अलिबागमध्ये प्रवेश केल्यानंतर वादळ मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यात प्रवेश करेल.