उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर : आणखी आठ जणांचे अर्ज प्रलंबित
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर येथील माहिती हक्क कार्यकर्ते जयंत मुकुंद तिनईकर (वय 64) यांच्यावरील जीवघेणा हल्ला दीड लाखांची सुपारी घेऊन करण्यात आला होता. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी खानापूर येथील हॉटेल व्यावसायिकासह 9 जणांना अटक केली होती. यामधील एका संशयिताला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
हॉटेल व्यावसायिक लक्ष्मण बाबुराव शेट्टी (वय 55, रा. रुमेवाडी क्रॉस) असे जामीन मिळालेल्याचे नाव आहे. शुक्रवार दि. 4 मार्च 2002 रोजी सायंकाळी झाडशहापूरजवळ ही घटना घडली होती. बेळगावहून खानापूरला जाताना जयंत यांची कार अडवून त्यांच्यावर रॉडने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाता-पायाला दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत.
बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी 9 जणांना अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात केली होती. यामधील लक्ष्मण शेट्टीसह लोकेश तिप्पान्ना कलबुर्गी (वय 34, रा. चौराशी गल्ली-खानापूर), गंगाप्पा रामाप्पा गुजनाळ (वय 34), भरमा कऱयाप्पा दासनट्टी (वय 35, दोघेही रा. मार्कंडेयनगर, बेळगाव), सुनील गोविंद दिवटगी (वय 24, रा. गजानननगर उद्यमबाग), सचिन प्रभू यरझरवी (वय 21, रा. तिसरे रेल्वेगेटजवळ, उद्यमबाग), ईश्वर महादेव हुब्बळ्ळी (वय 23, रा. शिवशक्तीनगर, अनगोळ), मंजुनाथ सोमशेखर होसमनी (वय 24, रा. गजानननगर, उद्यमबाग), अखिलेश अंबिकाप्रसाद यादव (वय 22, रा. ब्रम्हनगर, उद्यमबाग) यांनी जामीनसाठी अर्ज केला होता. जिल्हासत्र न्यायालयाकडे त्यांनी हा अर्ज दाखल केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे उच्च न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन लक्ष्मण शेट्टी याला 50 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्मयाच रकमेचा एक जामीनदार या अटींवर जामीन मंजूर केला आहे. संशयितांच्यावतीने ऍड. अशोक कल्याणशेट्टी आणि ऍड. व्ही. के. कळ्ळीमनी यांनी काम पाहिले आहे.