साटेली भेडशी/ प्रतिनिधी-
आठ दिवसांपूर्वी आवाडे येथील शेतकरी रमेश नाईक यांचा एक रेडा तिराळी नदीत वाहत गेला तर एक रेडा जखमी होण्याची घटना घडली होती. प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांनी या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचा पर्याय स्वीकारलाआहे.
आता तरी जलसंपदा विभाग जागे होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळेल या प्रतीक्षेत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते गोपाळ गवस, कानू दळवी आदी शेतकरी ,ग्रामस्थ यांचा पुढाकार व प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग झाले आहेत. आंदोलनकर्त्यांकडे कर्मचारी , अधिकारी यांनी पाठ फिरवली असून शेतकरी नुकसान भरपाई मिळत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार उपस्थितांनी केला आहे