नानोडा येथील शेतकऱयांची सरकारकडे मागणी
वार्ताहर /लाटंबार्से
नानोडा भागात तिलारी पाण्याचा योग्य पुरवठा होत नसल्याचे नानोडा येथील शेतकऱयांनी खंत व्यक्त केली आहे. यापूर्वी नानोडा भागात तिलारी पाणी गायब झाल्याने पाणी शेतकऱयांसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी शेतकऱयांनी उचलून धरली होती. अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध होताच माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी त्यात लक्ष घालून वरि÷ अधिकाऱयांबरोबर बोलणी करून नानोडा भागात पाणी उपलब्ध करून दिले होते पण त्या पाण्याचा प्रवाह कमी प्रमाणात असल्याने त्या पाण्याचा योग्य वापर शेतकऱयांना होत नसल्याचे नानोडा येथील शेतकऱयांचे म्हणणे होते. खरे तर तिलारीचे पाणी शेतकऱयांना ऑक्टोबर महिन्यापासून हवे असते परंतु मार्च महिना उजाडला तरी शेतकऱयांना तिलारी पाण्याचा योग्य पुरवठा होत नसल्याने शेती पिकवायची तरी कशी अशी खंत शेतकऱयांनी व्यक्त केली आहे. एकीकडे सरकार सांगते शेती करा जागा पडीक ठेवू नका. शेती करण्यासाठी सरकारी सेवेचा वापर करा. पण शेती करण्यासाठी पाण्याचा योग्य पुरवठा होत नसल्याने शेती तरी कशी करायची.
प्राप्त माहितीनुसार सोनार भाट – लाडफे येथे बांध घालून पाणी अडवून ठेवले जाते. सोनारभाट येथेही मोठय़ा प्रमाणात शेतकरी शेतीबरोबर बागायती पीक घेत असून त्यांची शेतीही तिलारी पाण्यावर अवलंबून असते. एक तर सरकारने तिलारीचे पाणी जास्त प्रमाणात सोडावे जेणेकरून त्याचा वापर इतर पुढील शेतकरी घेवू शकेल असे शाम हरमलकर, जयेंद्र केरकर, प्रमोद गाड या शेतकऱयांनी व्यक्त केली आहे . नानोडा भागातील तिलारी कालवा जलसिंचन खात्यातर्फे नुकताच साफसफाई केला असून तिलारी पाण्याच्या भरवशावर असलेली शेती करपेल त्यामुळे त्याची दखल नियमित घेतली जावी, अशीही मागणी केली आहे.
आज सरकारच्या विनंतीला मान देवून शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात पडीक असलेल्या जागेचे शेती बागायतीत रूपांतरित करून जागा कसून भात शेतीबरोबर बागायत मिरची भाज्यांची मोठय़ा प्रमाणात लागवड केली आहे. परंतु ऐन लागवडीच्यावेळी तिलारी कालव्याचे पाणी न सोडल्याने किंवा गायब झाल्याने परिसरातील नानोडा व इतर भागातील शेतकरी चिंतेत असतात. या दिवसात शेतकरी मोठय़ा प्रमाणात मिरची लागवड तसेच इतर भाज्यांची लागवड करीत असतात काही शेतकरी बागायातीचे पीक त्यामध्ये पोफळी, केळी या पिकांची मोठय़ा प्रमाणात लागवड केलेली आहे परंतु पाणीच नसल्याने पिकांची नासाडी होते.
ऑक्टोबर या महिन्यापासून शेतकरी मेहनत घेवून मिरची व इतर भाज्यांची लागवड मोठय़ा प्रमाणात करीत असतात अशामुळे नुकसानी सोसावी लागते.