जिल्हाधिकारी शेखर सिंह – दुसऱया डोस घेणाऱयांचे प्रमाण कमी
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात ऑक्टोबर महिन्यात कोरोना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती नाहीशी झालेली आहे. मात्र, सर्वांनी लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असून सध्या लसीकरण सुरु असताना देखील नागरिकांकडून प्रतिसाद कमी झाला आहे. पहिला डोस घेणाऱयांचे प्रमाण चांगले आहे. पण दुसरा डोस घेणाऱयांचे प्रमाण कमी आहे. दोन्ही डोस घेण्याची गरज असून तिसऱया लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कोरोना संसर्गाबाबत माध्यमांशी संवाद साधताना शेखरसिंह म्हणाले, लसीकरण मोहिम सुरु केली तेव्हा लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत होत्या. मात्र सध्या जिल्हय़ात लसीचे पुरेसे डोस उपलब्ध असून देखील कोरोना संसर्ग कमी झाल्याने नागरिकांकडून लसीकरणास अल्प प्रतिसाद मिळत आहे. कोरोना संसर्गातील परदेशातील अनुभव पाहता लसीकरणानंतर मृत्यूदर कमी होत असल्याचे समोर आले आहे.
आता दुसऱया लाटेचा कहर कमी झाला असून जिल्हा कोरोनामुक्त व्हावा ही सर्वांची भावना आहे. मात्र लसीकरण 100 टक्के पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. लसीकरणानंतर देखील कोरोना संसर्ग होत असल्याच्या काही केसेस असल्या तरी लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकतो तसेच हॉस्पिटलायज होण्याचे प्रमाण कमी राहील. यासाठी सर्व नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. जिल्हय़ात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे.
दुसरा डोस घेणाऱयांचे प्रमाण कमी
जिल्हय़ात आजमितीस एकूण 28 लाख 34 हजार 339 एवढे एकूण लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस घेणाऱया नागरिकांची संख्या 19 लाख 65 हजार 233 एवढी चांगली आहे. मात्र, दुसरा डोस घेणाऱया नागरिकांची संख्या 8 लाख 69 हजार 106 एवढी कमी आहे. त्यामुळे ज्यांचा ज्यांचा पहिल्या डोसचा कालावधी पूर्ण झाला आहे त्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तिसऱया लाटेविरुध्द लढण्यासाठी बळ मिळू शकते, असे शेखर सिंह यांनी सांगितले.