15 दिवस उलटले तरी कामाला सुरुवात नाही : अपघातास मिळतेय निमंत्रण : माहिती फलक लावणे गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात अनेक विकासकामे राबविली जात असताना नागरिकांचा जीव मात्र वेठीस धरला जात आहे. तिसरे रेल्वेगेट येथे उड्डाणपुलासाठी 6 ते 7 फूट खोदाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूला खोदाई करण्यात आली असली तरी त्या ठिकाणी कोणताही सूचना फलक नसल्याने रात्रीच्या वेळी ओव्हरटेक करताना अपघात होत आहेत. एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यास याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार घेणार का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
तिसरे रेल्वेगेट येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना खोदाई करून ठेवण्यात आली आहे. 15 ते 20 दिवस उलटले तरी अद्याप पुढील काम सुरू करण्यात आलेले नाही. अंदाजे 6 ते 7 फूट खोदाई करूनदेखील त्या ठिकाणी कोणताही माहिती फलक अथवा बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत. कंत्राटदाराच्या या गलथान कारभारामुळे रात्रीच्या वेळी एखादी दुचाकी अथवा चार चाकी या खड्डय़ामध्ये जाऊन पडण्याची शक्मयता आहे. रविवारी सकाळी काही वाहनचालकांनी कामगारांना जाब विचाल्यानंतर पांढरी पट्टी बांधण्यात आली.
मुख्य रस्त्याच्या शेजारीच खोदाई
बेळगाव-खानापूर मुख्य रस्त्याच्या शेजारी ही खोदाई करून ठेवण्यात आली आहे. दररोज हजारो वाहने या मार्गावरून ये-जा करीत असतात. याच पसिरात असणाऱया डी-मार्टला नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात खोदकाम लक्षात न आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे रॅम्प बनविण्यासाठी खोदकाम करण्यात आले असले तरी ते नागरिकांसाठी जीवघेणे ठरू लागले आहे.
रुग्णांना बसतोय फटका
रेल्वेगेटच्या अलीकडे असणाऱया दक्षता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दररोज ये-जा करणाऱया रुग्णांना व अति गंभीर जखमींना या खोदाईचा फटका बसू लागला आहे.
खोदाईमुळे हॉस्पिटलकडे बाजूने जाण्यासाठी अत्यंत अरुंद जागा शिल्लक असून त्यातून हॉस्पिटलमध्ये येणाऱया रुग्णांना जपून प्रवास करावा लागत आहे. वाहन चालवताना चुकून बाजूला गेल्यास अपघात होण्याची शक्मयता आहे. यामुळे जीव मुठीत घेऊन शहरातून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
वाहतूक कोंडी नित्याचीच तिसरे रेल्वेगेट येथे पुलाच्या बांधकामासाठी एका बाजूने रस्ता बंद असल्याने दुसऱया एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे तिसरे रेल्वेगेट कॉर्नरवर दिवसभर एकसारखीच वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच आता या खोदाईमुळे वाहने सावकाश चालवावी लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. त्यामुळे खोदाई केलेले काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.