जगभरात नाताळची गाणी म्हणत ख्रिस्त जन्माची शुभवार्ता देणाऱया ‘कॅरल’ गीतांचे गायन सुरू आहे. ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉजमुळे शिरशिरी आणणाऱया वातावरणात उत्साह निर्माण होत असताना सगळीकडे पुन्हा एकदा ओमिक्रॉनच्या दहशतीचे सावट पसरले आहे. नाताळचा जल्लोष सुरू असताना नेदरलँडमध्ये पूर्ण टाळेबंदी जाहीर झाली आहे. ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांमध्ये याहून वेगळी स्थिती नाही. ब्रिटनमध्ये तर एकाच दिवशी 12,133 नागरिकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याने भीती वाढली आहे. अमेरिकेतील स्थितीही बिकट होताना दिसत आहे. यंदाच्या 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आणि हा हा म्हणता, जगातील 96 देशांमध्ये त्याचा फैलाव झाला. झिम्बाव्वे, बोत्सवाना, नामिबियात या रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत आहे. युरोपातील अनेक देशांनी ‘लॉकडाऊन’चे संकेत दिले आहेत, काही ठिकाणी तो लागूही करण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये ख्रिसमसच्या उत्साहावर पाणी फेरण्याच्या शक्मयतेने तिथल्या सरकारने सध्या तरी कठोर निर्बंध टाळले असले तरी त्याच्याशिवाय फैलाव आटोक्मयात आणणे कठीण आहे. साहजिकच, नव्या वर्षात जगातील अनेक देशांत संपूर्ण टाळेबंदी असेल, अशी चिन्हे दिसत आहेत. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि इटलीसारख्या देशांत लसीकरणाचा वेगही संथ आहे. भारतातही लसीकरणाबाबत अनेक शंका-कुशंका घेतल्या जात आहेत. त्यांचे निराकरण तातडीने करणे गरजेचे आहे. कोविडला रोखणारी लस घेतल्यास लैंगिक क्षमतेवर विपरित परिणाम होतो, कोविडशिवाय अन्य आजार बळावतात वगैरे खुळय़ा समजुती खेडोपाडी पसरल्या आहेत. याखेरीज, ओमिक्रॉनसारखा कुठला आजारच अस्तित्वात नाही, असे मानणारे कित्येक लोक आहेत. त्यांचेही समुपदेशन होणे गरजेचे आहे. अनेकांनी धार्मिक कारणांमुळे लसीपासून स्वतःला अलिप्त ठेवले आहे. हे सारे अज्ञान आणि गैरसमजुतीतून उद्भवले आहे. सर्व धर्मगुरूंनी आपापल्या अनुयायांना, नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्याची आवश्यकता आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग याआधीच्या ‘डेल्टा’पेक्षा साडेपाच पटींनी अधिक आहे. अशा स्थितीत भारतातील नागरिकांना लसीकरणाबाबत सजग करणे महत्त्वाचे आहे. भारतात आजपर्यंत 137 कोटी डोस तयार करण्यात आले आहेत. एकूण लोकसंख्येच्या 88 टक्के लोकांनी पहिला आणि 58 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतल्याचा दावा केंद्रीय आरोग्य खाते करीत आहे. भारतात महिन्याला 31 कोटी डोस सध्या तयार केले जातात. येत्या काळात ही क्षमता दरमहा 45 कोटीपर्यंत जाईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सीन आणि स्पुटनिक अशा तीन लसी भारतीयांना दिल्या जात आहेत. मुद्दा आहे तो जनजागृतीचा. ‘आपल्याला काही होत नाही, लसीची काही गरज नाही…’, ‘कोविड आजारच अस्तित्वात नाही’ अशा वल्गना देशभरातील ग्रामीण आणि अगदी नागरी भागातही केल्या जात आहेत. त्यांना ओमिक्रॉनची संसर्गक्षमता लक्षात आणून देणे गरजेचे आहे. जगभरात कोविड 19 च्या ओमिक्रॉन व्हेरियंटची दहशत माजलेली असताना भारतासाठी पुढचे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओमिक्रॉन लसीकरणाला दाद देत नाही, असेही निरीक्षण आहे. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस घेतल्यामुळे आपण सुरक्षित आहोत, असे समजणेही घातक ठरू शकते. कोविडच्या डेल्टा व्हॅरियंटमुळे दुसरी लाट आलेली होती, अनेक तरुणांना तीत बाधा झाली. तिसरी लाट ओमिक्रॉनची असेल आणि ती बालकांसाठी हानिकारक ठरेल, अशी शक्मयता वर्तवली जात आहे. अशी लाट आलीच तर तिला तोंड देण्यासाठी आणि तिच्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने पुरेशा उपाय योजनेच्या दृष्टीने पावले उचलायला सुरूवात केली आहे. लस उत्पादनामध्ये वृद्धी करण्याबरोबरच राज्यांना व्हेंटिलेटर्सचा पुरवठा, मेडिकल ऑक्सिजन आणि औषधांचा साठा वाढवून पाठवल्याचे संसदेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तथापि, भारतीयांना दिल्या जाणाऱया लसी ओमिक्रॉनला तोंड देण्यासाठी सक्षम आहेत का, यावर संशोधन होणे आवश्यक आहे. ओमिक्रॉनवर मात करण्यासाठी आपली लस यशस्वी ठरते, असा दावा मॉडर्नाने केला आहे. भारत सरकारनेही आपल्या लसीकरणाच्या गुणवत्तेबद्दल माहिती दिल्यास लोकांच्या मनात लसींबाबत विश्वास निर्माण होईल. कोविडमुळे आपल्या देशात गेल्या दोन वर्षांत वाढत गेलेली महागाई आणि कमी होत गेलेला रोजगार यामुळे विचित्र वातावरण झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सत्तेसाठीच खेचाखेची चालली आहे. रोजच्या वापरातील वस्तू, रोज लागणारा भाजीपाला, पोशाख, गरजेची वाहने, वाहनांचे इंधन या सगळय़ांचेच भाव गगनाला भिडले आहेत. ही स्थिती सुधारण्याऐवजी राजकीय नेते निवडणुकीच्या मानसिकतेत मश्गूल आहेत. दुसरीकडे, सेन्सेक्समध्ये घसरण होत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी 40 दिवसांमध्ये 80 हजार कोटी काढले, फक्त डिसेंबर या एका महिन्यात ही रक्कम 26 हजार कोटीच्या घरात आहे. ओमिक्रॉनमुळे लावले जात असलेले निर्बंध, आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी, उदार पतधोरण मागे घेण्याचे संकेत या सगळय़ामुळे शेअर बाजार एका दिवसात 1190 अंशाने कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पावणेसात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. भारतातही टाटा स्टील, इंडसइंड बँक आणि अन्य कंपन्यांवर विपरित परिणाम झाला. चीनने कर्जाचा प्राईम रेट कमी केला, जपानमध्ये शांघाय शेअर बाजार कोसळला. भारतीय कंपन्यांचे मूल्य घटले. जगभरातील जनतेच्या दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम होत आहे. लसीकरणामुळे मिळणाऱया रोगप्रतिकारक शक्तीला चकवण्याची क्षमता ओमिक्रॉनमध्ये असावी, असे जागतिक आरोग्य संघटनेचेही म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर भारतात सध्या कुठेही लॉकडाऊन नाही, सगळे व्यवहार सुरू आहेत. तिसरी लाट आलीच तरी तिची तीव्रता आपल्या देशात कमी असेल अशी भाकितं वर्तवली जात आहेत.
Previous Articleराष्ट्रकुल क्वीन्स बॅटन रिले जानेवारीत
Next Article व्हेरेव्ह जर्मनीचा सर्वोत्तम क्रीडापटू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.