प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील निगडेनजीक शुक्रवारी रात्री दोन आयशर टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात शांताराम सखाराम आग्रे (70, चिंचघरी-चिपळूण) यांचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत.
अंकुश राजाराम पालकर (पेढे-चिपळूण), संतोष शांताराम आग्रे (चिंचघरी-चिपळूण), मनोहर तायडे, सागर गजानन वनारसे (31, वाणीपेठ), चंद्रकांत दत्ताराम खामकर (32, मुरडे-शिंदेवाडी) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने प्रसाद गांधी यांच्या रुग्णवाहिकेने चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात केले.
(एम.एच.08/एच.2711), (एम.एच.04/के.एफ.9501) या दोन आयशर टेम्पोसह (एम.एच.08/ए.झेड.6066) या तीन वाहनांमध्ये हा अपघात घडला. अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद, पोलीस निरीक्षक निशा जाधव हे घटनास्थळी पोहोचले. पोलीस व बुरहान टाके यांच्या रेस्क्यु पथकाने जखमींना मदतकार्य केले. याप्रकरणी अंकुश पालकर व टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इनामदार करत आहेत.