मुंबई
जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्री झाली आहे. यामध्ये मागील तीन महिन्याच्या कालावधीत म्हणजे जुलैनंतर पहिल्यांदाच रिलायन्सच्या समभागात 17 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली व भाव 2000 रुपयाच्या खाली आला. सध्याच्या पातळीवर उच्चांकी पातळीवर 14 टक्क्यांवर व्यवहार घसरला आहे.
16 सप्टेंबर रोजी रिलायन्सचे समभाग 2,368.80 च्या स्तरावर राहिले होते. या समभागाने त्यावेळी उच्चांक नोंदवला होता. कंपनीमध्ये जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी जोरदार गुंतवणूक केली आहे.