ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. देशातील रेल्वेचं जाळ अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसात वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणणार असून, पुढील तीन वर्षात 400 वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
पुढील 3 वर्षात 100 पीएम स्पीड पॉवर कार्गो टर्मिनल विकसित केले जातील. यासोबतच मेट्रो यंत्रणांच्या उभारणीसाठी नाविण्यपूर्ण पद्धतीही राबविण्यात येणार आहेत. छोटय़ा शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होणार आहे. मेट्रोचं जाळं प्राधान्यानं विकसित करणार असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.