रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला पुढे म्हणाली –
म्हणे स्वामी अद्यापिवरी । चैद्यमागधप्रमुखां वरिं ।
हेही स्वामींची वैखरी । जनव्यवहारिं वर्ततसे ।
एकें पर्णून आणिली घरा । जे पुंश्चळी असती दारा ।
नव नव यूनां देखोनि नरां । विकार अंतरामाजी उठती। पर्णित पुरुष असतां शेजे । मानसें नव नव तरुणां भजे । सज्ञान पुरुष तीतें उमजे । मानी ओझें भरणादि । भरण पोषण तीचें न करी । त्यागी जाणोनि दुराचारी । विषयसुखास्तव न टाकी दुरी । तो अधिकारी नरकाचा । सज्ञान जाणोनि तिची चर्या। तत्काळ त्यागी पुंश्चळी जाया । तदासक्त तो लोकद्वया । पासोनि पतन पावतसे । जनांमाजी क्वचित वर्ते । म्हणोनि वोलिलें श्रीअनंतें । येऱहवीं मद्विषयीं अघडतें । सर्वज्ञातें विदित असे । माझें नव नव पुरुषांवरी । मानस धांवत असेल जरी । जाणोनि सर्वज्ञ अंतरिं । मग मज बाहेरी घालावें । अपराध नसतां प्रेमकलहें । स्वामी वदलां कठोर जें हें । तें भेदतां वज्रप्रायें । पुढती स्नेहें सान्तविलें । जाणोनि सान्तवनाचें प्रेम । मीही वदलें जें समविषम । त्या नर्मोक्ति कुसुमासम । दुरुक्ति अधम न मानाव्या ।
कामसंभ्रमामाझारी। दंपती वदतां नर्मोत्तरिं। आनंदभरित ते परस्परिं । रोष अंतरिं न स्पर्शे। यालागीं उच्चावचें वचनें । सर्व क्षमावीं जनार्दनें ।
इतुकी प्रार्थना करूनि मौनें । चरण लक्षूनि
ति÷तसे ।
रुक्मिणी श्रीकृष्णाला म्हणाली – कुलटा स्त्रीचे मन तर विवाह झाल्यानंतरही नवनवीन पुरुषांकडे ओढ घेते. बुद्धिमान पुरुषाने अशा स्त्रीला आपल्याजवळ ठेवू नये. तिला स्वीकारणारा पुरुष इहलोक आणि परलोक असे दोन्हीही घालवून बसतो. माझे म्हणणे सांगताना मी काही कठोर बोलले असेन तर प्रभू, क्षमा असावी.
हें ऐकूनि जगदीश । भीमकीचें मनःसारस ।
निर्भय पावावया संतोष । बोले पीयूषमय वचनें ।
रुक्मिणीचे बोलणे ऐकल्यावर तिचे समाधान करण्यासाठी भगवान कृष्ण काय म्हणाले ते पहा.
हरि म्हणे वो साधुशीले । पतिव्रते भीष्मकबाळे ।
विनोदवचनें तवमुखकमळें। उपहास केले परिसावया।
तुवां बोलावें मृदुतर वचनीं । गुणलावण्यचातुर्यखाणी ।
तववाक्मयश्रवणाची शिराणी । आमुचे मनीं बहुकाळ ।
यालागीं आजि ये विलाससमयीं । नर्मोक्ति वदलों ज्या ज्या कांहीं ।
ते ते प्रेमसंरंभनवाई । नेणोनि हृदयीं भंगलीस ।
मग म्यां केलें सान्तवन । तेणें होवोनि निर्भय पूर्ण ।
तुझें यथोचित भाषण । तें यथार्थ व्याख्यान मान्य आम्हां ।
माझिया वचनामाजील अर्थ । तुवां वाखाणिला अन्वर्थ ।
तो तैसाचि होय हें यथार्थ । जाण निश्चित भीमकिये ।
राजपुत्रि या संबोधनें । भीमकी सम्मानिली बहुमानें ।
यावरी बोले प्रसन्नमनें। तीं हरिवचनें
अवधारा ।
भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणाले – साध्वी! राजकुमारी ! तुझ्या तोंडून हेच ऐकण्यासाठी मी तुझी थट्टा केली. तू माझ्या म्हणण्याचा जो जो अर्थ लावलास, तो अक्षरश: खरा आहे.
ऍड. देवदत्त परुळेकर