बुध. दि.17 ते मंगळ. दि. 23 .02.2021
वास्तु दोषाची महत्त्वाची कारणे
काही घरात बंगल्यात अथवा जागेवर गेल्यावर तिथे एकदम प्रसन्न वाटते तेथून जावेसे वाटत नाही, तर काही ठिकाणी रखरख जाणवते. तिथे क्षणभरही थांबू नये, असे वाटते. अशा ठिकाणी काही अज्ञात बऱया-वाईट शक्ती असतात. अध्यात्मिक क्षेत्रातील जाणकारांना त्या वाईट शक्तींचे स्पंदन समजते. हल्ली वास्तुशास्त्राच्या नावाखाली लोक नको त्या वस्तू घरात आणून ठेवतात. त्याचा काहीही फायदा होत नाही शिवाय पाडापाडी करून आपले नुकसान करून घेतात ते वेगळेच. स्वतःला वास्तूतज्ञ समजणारे एकदा वास्तू पाहून गेल्यानंतर तेथे ढुंकूनही पाहत नाहीत अथवा फोन केल्यावर दाद देत नाहीत, अशा तक्रारी आहेत. सूज्ञ माणसाने अशा वास्तू शास्त्रज्ञांच्या मागे न लागता स्वतः घरातील काही महत्त्वाचे फेरफार केल्यास अथवा अध्यात्मिक बळ वाढविले तर वास्तुदोष बऱयाच प्रमाणात कमी होऊ शकतात. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे तत्व जर प्रत्येकाने अंगिकारले तर स्वतःची वास्तू स्वर्ग-नरक करणे आपल्या हातात असते. अनेक वास्तू तज्ञांना बोलावून बऱयाच सुधारणा केल्या पण काहीही फरक नाही. फुकट पैसे गेले अशा तक्रारी खासगीत सांगत असतात. अशामुळे लोकांचे शिव्या शाप लागतात व ते पुढे भोगावे लागते. हल्ली वास्तू शास्त्रावरील अनेक पुस्तके मिळतात. ती स्वतः वाचा एकंदर महत्त्वाच्या दिशा दहा आहेत व त्यातील उपदिशा मिळून बत्तीस दिशा होतात. कागदावर या दिशा मांडून आपल्या घराची रचना कशी आहे ती लिहावे व त्यानुसार कुठे चुकते, कुठे काय काय असाव. ते पाहावे व त्यानुसार घराची फेररचना केल्यास घरातील वातावरण निश्चितच शांत व समाधानी होऊ शकते. काही गोष्टी सर्वसामान्य वास्तुतज्ञांना कळत नाहीत पण अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना मात्र त्या सहज समजतात. त्यामुळे घरातील वातावरण जर पवित्र व मंगलमय तसेच स्वच्छ ठेवल्यास वास्तू निश्चितच शांत व समाधानी राहते व न होणारी कामेदेखील होऊ शकतात. काही घरात देवघर कुठे आहे हे शोधावे लागत,s असे होऊ नये. तुम्ही कितीही मोठे श्रीमंत, हुशार, बुद्धिमान असाल पण तुमच्याकडे जर धार्मिकता नसेल तर मनशांती बिघडते व त्याचा परिणाम वास्तूवर होतो. घरात राहणाऱया व्यक्ती जर सतत नकारात्मक विचार करीत असतील तर त्याची स्पंदने भिंतीवर आढळतात व त्या घरात अशुभ वातावरण निर्माण होते. त्यामुळे त्या घरात किंवा वास्तूत, कारखान्यात, संस्थेमध्ये शांत पणा राहात नाही. वास्तू शांत ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे कोणतीही वस्तू आठ-पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ एका ठिकाणी राहू नये ती सतत वापरत असावी. आज ना उद्या उपयोगी पडेल म्हणून आपण जुन्या वस्तू अडगळीच्या ठिकाणी साठवून ठेवत असतो पण त्यामुळे नकारात्मक वातावरण तयार होते. घरात जळमटे, कोळीष्टके असतील तर ती अजिबात ठेवू नये, पूजेच्या वेळी धूप घातल्यास तसेच जमेल तसे रोजच्या रोज अग्निहोत्र केल्यास वास्तु निश्चितच शांत राहते असे अनुभव आहेत. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा पंचांगात दिलेले असतातच पण सर्वांनाच अग्निहोत्र जमणे शक्मय नसते. त्यासाठी संध्याकाळच्या वेळेस स्वच्छता करून देवासमोर तेलाचे अथवा तुपाचे निरांजन लावून शुभंकरोती मंत्र रोज म्हटल्यास वास्तूतील अनेक दोष निश्चितच कमी होतात व निरर्थक ठिकाणी खर्च होणारे पैसेही वाचतील. स्वतःच्या कष्टाच्या पैशाने घर बांधले असेल ती निश्चितच शांत असते. त्यामुळे वास्तुशास्त्रातील पाच-सहा महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवल्यास आपली वास्तू निश्चितच शांत राहते. वास्तुशास्त्रात हजारो तऱहेचे उपाय दिलेले आहेत पण त्या सर्वांचे पालन करणे अशक्मयप्राय असते.
मेष
या आठवडय़ात रवी शुक्र लाभात तर मंगळ धनस्थानी येत आहे. परिस्थितीत बरेच महत्त्वाचे फेरफार घडतील. आर्थिक सुबत्ता येईल. हाती घेतलेली अनेक कामे पूर्ण होऊ शकतात. खर्च मात्र वाढणार आहेत. डोळय़ांचे विकार असतील तर काळजी घ्यावी लागेल. गुरू शनीचे योग जागे संदर्भातील कामात यश देतील. पूर्वी निर्माण झालेली काही कटू प्रसंग आपोआप शमतील. नव्या मित्र-मैत्रिणी जोडले जातील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात आशादायक वातावरण.
वृषभ
आठवडय़ात रवि शुक्र दशमात तर मंगळ तुमच्या राशीत हा योग लक्ष्मीदायक मानला जातो. प्रयत्न सार्थकी ठरतील अनेक कामे विनासायास होऊ लागतील. सरकारी कामे, पडली असतील तर ती करून घ्या. विवाह संदर्भातील वाटाघाटी करताना अत्यंत जपून बोलावे लागेल. एक शब्द जरी चुकीचा गेला तरी त्याचे महत्त्व वाढेल व त्याचे भांडवल केले जाईल. नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱया पडतील. पूर्वीचे काही त्रास हळू हळू कमी होऊ लागतील. शारीरिक आजारावर मात कराल पूर्वी जर कुठे अर्ज केला असाल तर त्याचे उत्तर येईल.
मिथुन
गेला महिनाभर तुमची रास धोक्मयाच्या पातळीवर होती. पण या आठवडय़ात बदलणारे रवि शुक्र तुमच्या जीवनात आनंदी घटना घडवतील. मानसिक ताणतणाव कमी होईल. राहू मंगळाचे भ्रमण जरा त्रासदायक आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. गुप्त शत्रू निष्कारण त्रास देण्याचा प्रयत्न करतील. चारचौघांच्या बोलण्यात जर बाधिक जागाचा उल्लेख असेल तर तशा ठिकाणी जाणे टाळा. पूर्वीच्या मानाने पुढील ग्रहमान खूपच चांगले म्हणावे लागेल पण तरीही अजून धोका संपलेला नाही. आगामी काही दिवस सर्व बाबतीत जपून वागणे योग्य ठरेल.
कर्क
रवि शुक्र अष्टमात भ्रमण आरोग्याच्या बाबतीत काळजी निर्माण करणारे आहे. कोणत्याही बाबतीतील अतिरेक टाळणे आवश्यक. लाभस्थानी येणारा मंगळ वास्तुविषयक तसेच नोकरीच्या बाबतीत रखडलेली अनेक कामे पूर्ण करण्यास मदत करील. आर्थिक बाबतीतही सप्ताह उत्तम आहे. वारंवार प्रवास करणाऱयांनी जरा काळजी घ्यावी. राहू मंगळाचे भ्रमण इतर बाबतीत शुभ असले तरी वाहन अपघात व बाधिक दोष निर्माण करणारे आहे. त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल.
सिंह
दशमातील राहू मंगळाचे भ्रमण नोकरीविषयक काहीतरी शुभ घटना दर्शविते. पदोन्नती आवडत्या ठिकाणी बदली तसेच कमी श्रमात मोठे धनलाभ आणि वरि÷ांचा योग्य सल्ला व त्यांची मर्जी या दृष्टीने शुभ फळे मिळतील. सप्तमातील रवी शुक्रामुळे काही किरकोळ बाबी गंभीर गैरसमज निर्माण करू शकतात. त्यासाठी सावध राहावे. विशेषतः भगिनी वर्गाने आपले मोबाईल चुकूनही इतरांना देऊ नयेत त्याचा गैरवापर होईल आणि तुम्ही अडचणीत याल. नोकरी-व्यवसायानिमित्त दूरचे प्रवास घडू शकतील. विवाह कार्याची बोलणी करण्यास अनुकूल काळ आहे.
कन्या
ष÷स्थानी येणारे रवी शुक्र. कौटुंबिक जीवनात महत्वाची संकेत दर्शवित आहेत भाग्यस्थानात राहू मंगळ एकत्र असल्याने हटवादीपणा निर्माण होईल. बोलण्यात कठोरपणा ठेवू नका, अन्यथा होणारी कामे देखील खोळंबण्याची शक्मयता आहे. अति दूरचे प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. हाती घेतलेले प्रत्येक काम होईलच असे नाही पण तरीही प्रयत्न चालू ठेवा. एखादा मोठा लाभ या आठवडय़ात होण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनात काही व्यक्तीकडून नको ते आरोप येतील त्यासाठी सावधगिरीने वागा. कुणाशीही मोबाईलवर बोलताना काळजी घ्या, आपले बोलणे कोणी रेकॉर्डिंग करीत नाही याकडे लक्ष द्या.
तूळ
धोक्मयाची टांगती तलवार असलेले अनिष्ट ग्रहमान कमी होत आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे होवू लागतील. रवि शुक्राचा शुभयोग बऱयाच बाबतीत शुभ आहे. मुलाबाळांचा भाग्योदय, आर्थिक लाभ, प्रेमप्रकरणात यश, शिक्षणाचे अडथळे कमी होणे, असे चांगले अनुभव येतील. अष्टमातील राहू मंगळ बाधिक दोष, शत्रुपीडा, अपघात, खर्चात वाढ, असे प्रकार घडवील. त्यासाठी आपणास आगामी जुलै महिन्यापर्यंत जपून राहावे लागेल. नियोजन व आयोजन योग्य ठेवा म्हणजे कोणताही गोंधळ होणार नाही.
वृश्चिक
चतुर्थात शुक्र रवि कौटुंबिक जीवनात महत्त्वाचे फेरफार घडवतील. सप्तमातील राहू मंगळ भागीदारी व्यवसाय आणि वैवाहिक जीवनात काहीतरी गडबड गोंधळ निर्माण करण्याची शक्मयता आहे सावध राहा. कोर्ट प्रकरणे सुरू असेल तर पुढे ढकलणे योग्य ठरेल. नोकरी व्यवसायाच्या बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे. अपेक्षित ठिकाणी बदली, प्रवास, पदोन्नती, मानसिक समाधान यादृष्टीने सप्ताह उत्तम आहे. पश्चिमेकडील प्रवास जपून करावेत, तसेच आर्थिक व्यवहारात चुकूनही कुठे गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या.
धनु
पराक्रमात येणारे रवि शुक्र तुमच्या कलागुणांना प्रोत्साहन देतील. काही कामात नवी कल्पना अमलात आणल्याने तुमचे महत्त्व वाढेल. ष÷ातील मंगळ राहुमुळे शत्रूंची दाणादाण झालेली दिसून येईल, पण आरोग्याच्या बाबतीत हा योग चांगला नाही उष्णता व पीत विकारापासून जपा. जुन्या पुराण्या व गंजलेल्या वस्तू चुकूनही वापरू नका किरकोळ गाफीलपणा देखील मोठा उत्पात घडवू शकेल. घर, जागा, मालमत्ता खरेदीसाठी योग्य काळ. काही अपरिचित व्यक्तीकडून जीवनाला महत्त्वाची दिशा मिळेल.
मकर
तुमच्या राशीतील रवी शनीची युती संपलेली आहे. त्यामुळे बऱयाच अडचणी कमी होऊ लागतील. धनस्थानातील रवी शुक्राची युती काही महत्त्वाच्या आर्थिक योजना नवी दिशा देण्याची शक्मयता आहे. त्याचा फायदा करून घेतला तर कमी श्रमात फार मोठ यश मिळू शकेल. घाई गडबड, मोबाईल बोलणे, संदेश पाठवणे याबाबतीत जरा सावधानता बाळगा. चुकून एखाद्याचा संदेश दुसऱयाला गेल्यामुळे गैरसमज निर्माण होतील.
कुंभ
लाभस्थानातील रवी शुक्राची युती अनेक बाबतीत फायदेशीर आहे जेथे मोठा खर्च आहे अशी कामे सहज आणि कमी खर्चात होतील. काही सल्ला लाभदायक ठरेल. यांच्याकडून ऐनवेळी मोठी मदतही मिळू शकते. चतुर्थातील राहु मंगळाचा योग बाधिक दोष, त्यामुळे वास्तू शुद्ध व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा. अनोळखी व बाधित लोकांपासून दूर रहा, इतर बाबतीत ग्रहमान अनुकूल .
मीन
रवी शुक्राचे भ्रमण नेत्रदोष निर्माण करेल. खर्चात वाढ एखाद्या कामासाठी ठेवलेले पैसे दुसऱया कारणासाठी खर्च होतील. एखाद्या अनोळखी व्यक्तीने केलेल्या फोन संसारी जीवनात गैरसमज निर्माण करेल. मंगळी राहूचे भ्रमण प्रवास, पत्रव्यवहार आणि वादावादी यासाठी अनुकूल नाही. या आठवडय़ात कुणाशीही बोलताना जपून बोला. पत्रव्यवहारात शब्दाचा वापर सांभाळून करा. कानाची दुखणी हाताला जखम होण्याची शक्मयता आहे. जितके सावध राहा, तितके उत्तम ठरेल.