बुधवार दि. 7 ते मंगळवार दि. 13 जुलै 2021
वाणीचा दुरुपयोग म्हणजे सरस्वतीचा अपमान!
आज जगात जी माणसे स्वतःच्या कर्तबगारीवर मोठी झालेली आहेत. ते सर्वजण सरस्वतीच्या कृपेनेच वर आलेले आहेत. आपल्या वाणीवर सरस्वतीचा अंमल असतो. आज जगात सर्वत्र लढाया, युद्ध, गैरसमज, मारामाऱया, शत्रुत्व हे जे प्रकार दिसून येतात ते सारे सरस्वतीच्या अवकृपेमुळे होतात पण जर तुमची वाणी जर अंतःकरणपूर्वक मधुर असेल, तसेच वाणीचा कसा उपयोग करावा याचे जर सम्यक ज्ञान असेल तर जगात तुम्ही कधीही अपयशी ठरणार नाही. सारे जग तुम्ही जिंकू शकाल. जर लोकप्रियता, लोकांचे प्रेम, आपुलकी, स्नेह, लक्ष्मीची कृपा, मानसन्मान, उत्तम आरोग्य, कुटुंबाचे कल्याण व्हायला हवे असेल तर वाणीचा सदुपयोग करण्यास शिका. सरस्वती जितक्मया प्रमाणात प्रसन्न होईल. त्याच्या दुप्पट लक्ष्मी प्रसन्न होईल. सरस्वतीचा अपमान झाल्यास लक्ष्मीचं कोप निश्चितच होतो. हे अनेकांना माहीत नसेल. आज-काल लोक एकमेकांविषयी गैरसमज पसरविण्यात अग्रेसर असतात. आपल्या वाणीचा दुरुपयोग करतात. एखादा माणूस खरोखर चांगला असतो पण कोणाचेतरी ऐकून त्याच्याविषयी खोटेनाटे सांगून त्याला बदनाम केले जाते किंवा त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण केले जातात. देवासमोर उभे राहून याचे वाईट होऊ दे, त्याचे वाईट होऊ दे, त्याचा सत्यानाश होऊ दे असे गाऱहाणे घालतात. पण एखाद्याचे चांगले व्हावे, उत्कर्ष व्हावा, त्याची भरभराट व्हावी, त्याला परीक्षेत यश मिळू देत, त्याचे लवकर लग्न होऊन देत असे कधीही देवाला सांगत नाहीत. जे दुसऱयांचे वाईट चिंतित आहेत, त्यांचे प्रथम वाईट होते. हे लोकांना कळत नाही. लोकांचे वाईट चिंतून कळत-नकळत सरस्वतीचा अपमान करत असतो, हे लोकांच्या लक्षात येत नाही. मनुष्यप्राणी म्हटल्यावर प्रत्येकाला शत्रू-मित्र हे असणारच. जे काही वादविवाद, मतभेद असतील ते परस्पर विचाराने व योग्य सल्लामसलत करून मिटविणे शक्मय असते. पण वास्तविक असे होत नाही. एखाद्या विषयी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे फार वाईट परिणाम होतात व संपूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम आज ना उद्या भोगावे लागतात. प्रत्येकाचे नशीब निरनिराळे असते. एखाद्याचा भाग्योदय लवकर होईल तर दुसऱयाचा उशिरा होईल. परमेश्वर कोणावरही अन्याय करीत नाही. फक्त आपली वेळ यावी लागते. स्वतःच्या कष्टाने एखादा माणूस वर येत असेल तर इतरांना पोटदुखी का व्हावी? देवाने इतके चांगले तोंड दिले आहे, त्याचा दुरुपयोग का करावा? जर तुम्हाला सर्वतऱहेने चांगले व्हावे, सर्वांनी आपली प्रशंसा करावी, प्रसिद्धी व नावलौकिक तसेच लोकांचे प्रेम मिळावे असे वाटत असेल तर एखाद्याविषयी चांगले बोलण्यास शिकावे. त्याच्याविषयी मागे चुकूनही वाईट बोलू नये. उलट त्याच्या चांगल्या गुणांची स्तुती करावी. एखाद्या विषयी कृतज्ञता, तसेच तुमची वाणी जितकी स्वच्छ, प्रामाणिक, पवित्र व मधुर असेल त्याप्रमाणात तुमचे भाग्य निश्चितच उजळते. एक वर्षभर प्रयत्न करून पहा. तुमचे तुम्हालाच कळेल की आपण किती टॉपला गेलो आहोत. (पूर्वार्ध)
मेष
दर्श अमावस्या तृतीय स्थानी होत आहे. नातेसंबंध आणि व्यवसायात काही फेरबदल घडतील. नोकरी-व्यवसाय बदलण्याचा योग. शेजारी व नातेवाईकांच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना. कौटुंबिक सुख वाढेल. आर्थिक विवंचना कमी होतील. राजकारणात असाल तर तुमच्या सल्ल्याला महत्त्व प्राप्त होईल. दीर्घकाळ रखडलेल्या अनेक महत्त्वाकांक्षा यापुढे पूर्ण होऊ लागतील. राहती वास्तु व नोकरीसंदर्भातील काही समस्या असतील तर त्या कमी होऊ लागतील. गुरु-नेपच्यून-चंद्राच्या उपयोगामुळे आध्यात्मिक शक्तीचा विकास होईल.
वृषभ
धनस्थानी शुभयोगावर दर्श अमावस्या होत आहे. मोठय़ा प्रमाणात धनलाभाचे योग. नोकरीत वरि÷ांचे उत्तम सहकार्य मिळेल. काही चुकीच्या यंत्रणेमुळे नुकसान होण्याची शक्मयता. नात्यातील गैरसमजुतीमुळे जीवनात काही गुंतागुंतीची प्रकरणे निर्माण होतील. पण पूर्वापार चालू असलेले शत्रुत्व नष्ट होईल. आजूबाजूचे लोक व नातेवाईक यांच्याशी संबंध सुधारतील. महत्त्वाच्या कागदोपत्रीकामासाठी हे सारे अनुभव येतील. वैवाहिक बाबतीत काही महत्त्वाच्या घटना घडतील. एखादा नवीन विषय सुरू करणार असाल तर पती-पत्नीनी परस्परांचा सल्ला अवश्य घ्यावा.
मिथुन
तुमच्या राशीतच होणारी दर्श अमावस्या तसेच आठव्या शनिमुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कळत-नकळत चुकीच्या गोष्टी हातून होतील. त्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे पण आर्थिक लाभ, नोकरी, व्यापार-उद्योगात मोठे लाभ, कर्जफेड यादृष्टीने उत्तमकाळ भाग्यस्थानी असलेल्या गुरुच्या कालखंडात कोणतेही महत्त्वाचे धार्मिक कार्य यशस्वी होईल. सट्टा, लॉटरी, शेअरबाजार यात जपून गुंतवणूक करा अन्यथा बरेच नुकसान होईल. बाराव्या राहूचा अनिष्ट परिणाम काही प्रमाणात कमी होईल.
कर्क
बाराव्या अशुभस्थानी होणारी दर्श अमावस्या शत्रुत्व आणि कर्ज तसेच आरोग्य या दृष्टीने महत्त्वाची ठरेल. लग्नात येणाऱया अडचणी कमी होतील. रुपसौंदर्य नोकरी-व्यवसाय, बुद्धिमत्ता यासह काही बाबतीत तडजोड करावी लागेल. विवाह झाला असेल तर जागेचे असलेले व्यवहार होऊ लागतील. मानसिक रोग, हूरहुर, हिस्टेरिया वगैरेपासून जपा. कारखानदारी क्षेत्रात वावरताना काळजी घ्या. नको ते प्रकार घडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबतीत चांगले अनुभव येतील. काही आर्थिक समस्या असतील तर त्यावर मार्ग निघेल. नावलौकिक, प्रशंसात्मक कार्य, आरोग्य याबाबत चांगले अनुभव येतील. कोर्टप्रकरण सुरू असेल तर सप्तम शनिमुळे अनुकूल निकाल लागेल.
सिंह
लाभस्थानी होणारी दर्श अमावस्या सर्वबाबतीत शुभफळ देणारी आहे. आर्थिक बाबतीत चांगले यश देईल. नोकरी-उद्योग-व्यवसायात नजर लागण्यासारखी प्रगती होईल. हाती पैसा टिकू लागेल. मंगलकार्यासाठी देण्याघेण्याची अडचण कमी होईल. कितीही संकटे आली तरी त्यातून मार्ग कसा काढावा याचे आपोआप ज्ञान होईल. नोकरीच्या शोधात असाल तर त्यात यश मिळेल. विवाहाच्या बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे. त्यामुळे चांगले स्थळ आल्यास ते सोडू नका. हमखास यश देणाऱया काही योजना अथवा शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची संधी मिळेल. या आठवडय़ात पाठीच्या कण्याच्या विकारापासून सावध रहा.
कन्या
दशामस्तानी होणारी दर्श अमावस्या नोकरी, व्यवसाय, मानसन्मान, याबाबतीत चांगले यश देईल. सहाव्या गुरुची धन व दशम स्थानी नजर असल्याने आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम फळे मिळतील. सर्वबाबतीत अनेकांचे उत्तम सहकार्य मिळेल. शुक्र-मंगळ योगामुळे वाहन वगैरे खरेदी करू शकाल. हाती पैसे येऊ लागतील. कौटुंबिक सुखात वाढ झालेली दिसून येईल. देण्याघेण्याच्या व्यवहारातून कांही मतभेद निर्माण होऊ शकतात. महत्त्वाचे कागदपत्रावर सही करताना काळजी घ्यावी. एखादा नवीन व सहज परवडण्यासारखा व्यवसाय सुरू करू शकाल. कुणाच्याही मार्मिक टिकेकडे लक्ष देऊ नका. तसेच अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल असे वागू नका.
तूळ
पंचमातील गुरु शिक्षण, नोकरी, विवाह व व्यवसायाच्या बाबतीत अनुकूल आहे. हंगामी स्वरूपाची नोकरी असेल तर ती कायमची होईल. प्रमोशनसाठी प्रयत्न करा. वेतनवाढ होण्याचे योग. राजकारणात जाण्याची इच्छा पूर्ण होईल. अंगच्या सुप्त कलागुणांना सादर करण्याची संधी मिळेल. नोकरी, व्यवसाय व कौटुंबिक वातावरण शांत व समाधानी राहील. माता-पिता यांच्या बाबतीत वैचारिक मतभेदांमुळे काळजीचे प्रसंग. या आठवडय़ात अनेक महत्त्वाच्या उलाढाली होतील. वास्तुविषयक कामे असतील तर ती पूर्ण होतील.
वृश्चिक
दर्श अमावस्या अष्टमस्थानी होत आहे. त्यामुळे अमावस्येच्या आसपास दोन-तीन दिवस कोणतेही निर्णय जपून घ्या. सर्वतऱहेच्या अपघात व दुर्घटनेपासून जपा. चतुर्थातील गुरुमुळे काही भाग्यवंतांना चार चाकी वाहनाचे योग. घराचे खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण होऊ शकतील. कॉलेजचे उच्चशिक्षण घेण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. महत्त्वाच्या कार्यात जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. योग्य सल्ला देणारी मित्रमंडळी भेटतील. शुभकार्यात यश, व्यापार-उद्योग जोरात चालेल. कोर्ट प्रकरणे, जामीनकी वगैरे प्रकरणात अडकू नका. व्यवसायिक असाल तर चांगली प्रगती होईल.
धनु
राहूच्या कृपेमुळे कष्टाला सोनेरी झालर लागेल. जीवनात अचानक सर्वकाही मिळत जाईल पण काही लोकाशी व्यवहारी दृष्टिकोनातूनच संबंध ठेवावे लागतील. मनातील काही गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका. तुमच्या कामाची पद्धत अथवा योजना शक्मयतो गुप्त ठेवा. स्तुती करणाऱया लोकांपासून दूर राहणे आवश्यक. आर्थिक बाबतीत महत्त्वाच्या संधी येतील. आतापर्यंत न झालेले मोठे व्यवहार पूर्ण होतील. व्यवसायात शक्मयतो बदल करू नका. जागेसंदर्भातील कागदपत्रे नीट जपून ठेवावी लागतील. विवाहाच्या बाबतीत जरा तडजोड करावी लागेल. कोर्ट मॅटर पासून दूर राहा.
मकर
अमावस्येदरम्यान आरोग्याची काळजी घ्या. पण आर्थिक व्यवहारास हा योग चांगला आहे. विमा व तत्सम मार्गाने मोठय़ा धनलाभाचे योग. अचानक घडलेल्या काही घटनांमुळे महत्त्वाचे बेत बदलावे लागतील. सरकारी क्षेत्रातील एखाद न होणारे काम होऊन जाईल. मुलाबाळांच्या विवाहाचा प्रश्न सुटेल. कोर्ट प्रकरणे सुरू असतील तर कागदपत्रे व साक्षीपुरावे योग्य ठेवणे आवश्यक. प्रवास, भागिदारी, महत्त्वाच्या वाटाघाटी, आर्थिक व्यवहार, मध्यस्थी यास अनुकूल काळ आहे. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी पडण्याची शक्मयता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही.
कुंभ
पंचम स्थानात होणारी अमावस्या आध्यात्मिक कार्य, जपजाप्य, मनशांतीसाठी, पूजाअर्चा यासाठी अनुकूल आहे. पण मुलाबाळांच्या बाबतीत जरा काळजी घ्या. शनि अनिष्ट स्थानी आहे. त्यामुळे तुम्ही जपून राहणे आवश्यक आहे. कोणतेही काम वेळेवर होईलच असे नाही, त्यासाठी मन शांत ठेवूनच आळशीपणा न करता कामे करून घ्यावीत. आर्थिक आवक मंदावेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. आपल्या बोलण्याचा कुणी दुसराच अर्थ काढू नये याची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात वरि÷ांशी ताणतणाव वाढवू नका. इतर बाबतीत ग्रहमान उत्तम आहे. कोर्टमॅटर व प्रवासाच्या बाबतीत बेफिकीर राहू नका.
मीन
चतुर्थात दर्श अमावस्या होत आहे. कौटुंबिक त्रास असेल तर आपली माणसे म्हणून आपण आपल्या अडचणी सांगतो, पण त्याच व्यक्ती गैरफायदा घेण्याची शक्मयता असते. त्यामुळे कोणासमोरही आपली संकटे सांगू नका. शुक्र-मंगळ योग चैन, विलास व ऐषाराम यासाठी मोठे खर्च करण्यास भाग पाडेल. हा योग व आर्थिक हानी दर्शवतो. महत्त्वाची कामे रेंगाळली तर खर्चाचे प्रमाण वाढेल. घराची दुरुस्ती वगैरे करताना अपघात होणार नाहीत याची काळजी घ्या. महत्त्वाची कामे स्वतः करा. इतरावर सोपविल्यास बऱयाच अडचणी निर्माण होतील. कष्ट, चातुर्य व कलाकौशल्य असूनही कुणाचा पाठिंबा नसल्यामुळे यश मिळत नाही. त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून कामे करा.