निवडणूक-आचारसंहितेचा परिणाम : मे महिन्यापासून नवे वीजदर लागू होण्याची शक्मयता
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात दरवषी 1 एप्रिलपासून नवे वीजदर लागू केले जातात. यासाठी वीज वितरण कंपन्यांनी आपले प्रस्तावित दर केईआरसीकडे पाठविले होते. परंतु या दरम्यानच बेळगावसह राज्यात पोटनिवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली. या आचारसंहितेमुळे नवे वीजदर लागू करणे तूर्तास तरी टळले आहे. परंतु निवडणूक कार्यक्रम आटोपताच मे महिन्यापासून राज्यात नवे वीजदर लागू होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
आधीच महागाईने होरपळून निघालेल्या नागरिकांना आता वीज दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. मागीलवषी कोरोनामुळे दरवाढ स्थगित करण्यात आली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून नवे दर लागू करण्यात आले होते. कोरोनामुळे आधीच व्यवसाय, उद्योग ठप्प असतानाही नागरिकांवर ही दरवाढ थोपविण्यात आली. याला काही महिने उलटले असतानाच आता पुन्हा एकदा विजेची दरवाढ केली जाणार आहे.
मार्च महिन्यात हेस्कॉमने आपला वाढीव दराचा प्रस्ताव केईआरसीकडे दिला होता. त्यानंतर या दरवाढीबद्दल नागरिकांचे आक्षेपही नोंदविण्यात आले. हुबळी येथे झालेल्या आक्षेप नोंदणी बैठकीत उद्योजक तसेच नागरिकांनी दरवाढ न करण्याची मागणी केईआरसीकडे केली होती. परंतु वीज खरेदी व विक्री यातील तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडे पर्याय नसल्याने ही दरवाढ निश्चित असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले होते. 1 एप्रिलपासून राज्यात नवे वीजदर लागू करण्यापूर्वीच राज्यातील लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या. आचारसंहिता असल्याने तात्काळ विजेची दरवाढ थांबविण्यात आली आहे. 2 मे ला निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात नवे वीजदर लागू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे तूर्तास जरी दरवाढ टळली असली तरी पुढील महिन्यात नागरिकांना दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.