कोरोना नियंत्रणात आल्यावर आढावा घेऊनच निर्णय – जिल्हाधिकारी
एकाही शाळेचा ठराव नाही : पालकांकडून सूचना मागविल्या
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनामुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला, तरी जिल्हय़ात अजूनही कोरोनाची परिस्थिती निवळलेली नाही. त्यामुळे तूर्तास तरी 15 जुलैपासून सिंधुदुर्गात शाळा सुरू करणे शक्मय नाही. कोरोना रुग्णसंख्या जशी घटेल, तसा आढावा घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी दिली.
कोरोनाची दुसरी लाट राज्यातील काही जिल्हय़ांत ओसरल्यावर कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याबाबत आढावा घेतला असता जिल्हय़ात 743 महसुली गावांपैकी 308 गाव कोरोनामुक्त झाले आहेत. तर 435 गाव अजूनही कोरोना बाधित आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत जिल्हय़ात घट होत असली, तरी कोरोनाची स्थिती पूर्णपणे निवळलेली नाही. तसेच कोरोनाच्या तिसऱया लाटेचाही इशारा देऊन मुलांनाच तिसऱया लाटेचा धोका असल्याचे वर्तवले आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहिली, तर तूर्तास तरी शाळा सुरू करणे शक्मय नसल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाचा शैक्षणिक क्षेत्राला मोठा फटका
कोरोना संक्रमणाचा मोठा फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. गतवषी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर नोव्हेंबर 2020 मध्ये शाळा सुरू केल्या होत्या. त्यावेळी पालकही शाळा सुरू करण्यासाठी आग्रही होते. परंतु यावेळी शाळा सुरू करायला हव्यात, अशी प्रत्येकाची इच्छा असली, तरी पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास इच्छूक नाहीत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होणे कठीण आहे. शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक स्तरावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व पालक यांच्याकडून शाळा सुरू करण्याच्या मागणीचे ठराव आल्यास शाळा सुरू करण्याचा विचार करता येईल.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाची परिस्थिती हळूहळू आटोक्मयात येत आहे. रुग्णसंख्येत घट होऊन ती निम्यापेक्षा कमी झाली आहे. असे असले तरी कोरोना रुग्ण अजूनही दररोज सरासरी दोनशे-अडिचशे आढळत आहेत. ते अजून कमी होण्यास काही दिवस जातील आणि कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका आहेच. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत अजून घट झाल्यानंतर आणि कोरोनामुक्त गावांची संख्या वाढल्यावर जिल्हय़ाचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
कोरोनामुळे साधारण दीड वर्ष शाळा प्रत्यक्ष सुरू केली गेली नाही. सर्व शिक्षण पद्धती ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतली जाते. सध्या ज्या गावामध्ये कोरोनाबाधित एकही रुग्ण संख्या नसेल, अशा ठिकाणी अशा गावांमध्ये 15 जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कोरोना नसलेल्या गावातील शाळा सुरू करण्यासाठी शाळांनी पालकांशी चर्चा करून ठराव करण्याचे सूचित केले आहे. मात्र, पालकच साशंक अवस्थेत असल्याने जिल्हय़ातील एकाही शाळेने अजून ठराव केलेला नसला, तरी पालकांकडून सूचना मात्र मागविण्यात आल्या आहेत.
कोरोना नियंत्रणात आल्यानंतरच शाळा सुरू – शिक्षणाधिकारी
सिंधुदुर्ग जिल्हय़ात अनेक शाळांमधून पालकांना ऑनलाईन सर्व्हे फॉर्म भरण्यासाठी दिला जात आहे. नववी, दहावी, अकरावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या भविष्याच्यादृष्टीने महत्वाचा पाया असल्याने, या वर्गातील मुलांना नियमित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. आज अनेक गाव, शाळांमध्ये इंटरनेटची उपलब्धता नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याचा विचार करून कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येताच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली.