ऑनलाईन टीम / दिसपूर :
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर बंगालमधील भाजपाचे 400 कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय आसाममध्ये दाखल झाल्याचा दावा आसाममधील मंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केला आहे.
बिस्वा शर्मा म्हणाले, बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असून, यात आतापर्यंत 11 कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावला आहे. तृणमूलकडून हा हिंसाचार होत आहे. त्यामुळे भाजपचे 300 ते 400 कार्यकर्ते आपल्या कुटुंबासह आसाममधील धुबरी येथे निघून आले आहेत. आम्ही त्यांना निवारा आणि अन्न देत आहोत. ममता बॅनर्जींनी लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेले राक्षसी नृत्य थांबवायला हवे. बंगाल यापेक्षा अधिक चांगल्यासाठी पात्र आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बंगालमधील हिंसाचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागितला आहे.