खोटय़ा आश्वासनांची खैरात : भाजप महिला मोर्चाची टीका
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील विधानसभा निडणूकीत आपले नशीब आजमविण्यासाठी गोव्यात आलेल्या विविध राजकीय पक्षांनी सध्या योजनांचा बाजार मांडला असून पोकळ आश्वसने देत सूटले आहे. असे भाजपा महिला मोर्चा प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी सांगितले. गृह लक्ष्मी योजनेच्या नावाखाली महिलांची संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे त्याचा दुरुपयोग झाला तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला असून त्याबाबत निवडणूक ओयोगाला कळविण्यात आल्याचे सुलक्षणा सावंत म्हणाल्या.
काल मंगळवारी येथील भाजप मुख्यलायात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुलक्षणा कामत बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत महिला मोर्चाच्या अध्यक्षा शितल नाईक, शिल्पा नाईक, रंजीता पै, गिता कदम, कृणाली मांद्रेकर व अन्य मान्यवर उपस्थित होत्या. गृह लक्ष्मी, युवा शक्ती कार्ड अशा विविध योजनांची आश्वासने दिली जात आहे. मात्र ही आश्वासने पूर्ण कशी करणार याबाबत कोणतीच माहिती नाही. वास्तविक ज्या योजनांची आश्वासने दिली जात आहेत त्या योजना गोव्यातील भाजप सरकारने केव्हा तरी सुरु केल्या आहेत. आणि गोव्यातील अनेक कुटुंब त्याचा फायदाही घेत आहेत. त्यामुळे गोवेकरांना भुरळ घालण्याचा प्रयत्न कुणी करू नये. गोव्याची जनता जागरुक आहे खोटी आश्वासने देणाऱयांना योग्य ती जात दाखविणार यात शंकाच नाही असेही सुलक्षणा सावंत म्हणाल्या.
तृणमूल काँग्रेस पक्षाचे गोव्यात सरकार आल्यास गृह लक्ष्मी योजने द्वारे प्रत्येक महिलेला दरमहा पाच हजार रुपये दिले जातील असे बिनबुडय़ाचे आश्वासन तृणमूल कांग्रेस पक्षाचे नेते देत आहेत. वास्तविक हे शक्य आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोव्यात लाडली लक्ष्मी आणि गृह आदार योजना अगोदरच सुरु आहे. त्या दिन्ही योजनांचा मिलाप म्हणजेच गृह लक्ष्मी की काय आसा टोमणा सुलक्षणा सावंत यांनी मारला. स्व. मनोहर पर्रीकर सरकारच्या काळात 2012 एप्रिल महिन्यापासून गोव्यात गृह आदार योजना सुरु करण्यात आली असून आज 1 लाख 31 हजार 131 महिला त्याचा लाभ घेत आहेत. गोव्याचे एकूण बजेट 21 हजार 647 कोटी इतके असून त्यातील 1 टक्के रक्कम ही गृह आधार योजनेसाठी खर्ज केली जात आहे. या शिवाय जनतेचे हित जपून भाजपने अशा विविध योजना मार्गी लावल्या असून जनता त्याचा लाभ घेत आहे असे सुलक्षणा सावंत यांनी सांगितल.
तृणमूल काँग्रेसची सर्वे सर्वा ममता बॅनर्जी जी योजना गोव्यात सुरु करू पाहत आहे आणि बेकायदेशीर रित्या त्या योजनेसाठी येथील महिलांची माहिती गोळाकरून त्यांना कार्डचे वाटप करीत आहे त्यांनी अगोदर पच्छिंम बंगाल येथे ही योजना राबवावी आणि मग गोमंतकीयांना आश्वासन द्यावे. गोव्यात भाजप दहा वर्षे सत्तेत आहे तसेच पच्छिम बगांलमध्ये ममता बॅनर्जी दहा वर्षे मुख्यमंत्री आहेत. गोव्यात या योजना 2012 सालात सुरु झाल्या आहेत मात्र ममता बॅनर्जी यांनी लक्ष्मी भंडार योजना जुलै 2021 मध्ये सुरु केली असून त्याची अमंल बजावणी सप्टेंबर महिन्यात होणार आहे. वर्षाला लाखो कोटींचे बजेट असलेल्या पच्छिम बंगाल मध्ये लक्ष्मी भंडार योजनेसाठी केवळ 0.36 टक्के रकमेची तरतूत करण्यात आली आहे. लक्ष्मी भंडार योजने खाली 500 ते 100 पर्यंत लोकांना मदत दिली जाणार आहे. उलट गोव्यात प्रत्येक महिलेला गृह आधार योजने खाली 1500 रुपये दिले जात आहेत. गोव्यातील महिलांना दरमहा पाच हजार रुपये देण्याची बाता मारणाऱया ममता बॅनर्जी यांनी अगोदर आपल्या राज्यातील महिलांना दरमहा पाच हजार रुपये द्यावे असे आव्हान सुलक्षणा सावंत यांनी केले आहे.
गोव्याची जनाता स्वभिमानी आणि जागृत असून पोकळ आश्वासनाना भूलणार नाही असे शितल नाईक यांनी सांगितले. गोव्यात तृणमूल पक्ष सत्तेत नाही तसेच त्यांचा एकादाही आमदार नाही असे असताना योजनांचे आश्वासन देऊन येथील महिलांची सविस्तर माहिती कशी काय मिळवू शकतात असा एक प्रश्न आहे. बँक खात्यासह मोबाईल नंबर तसेच इतर माहिती मिळवून नंतर त्याचा दुरुवयोग झाला तर त्याला जबाबदार कोण अशा प्रश्न शितल नाईक यांनी उपस्थित केला आहे. कशात नाय काय आणि धोतरात पाय अशी स्थिती सध्या तृणमूलची झाली असून केवळ गोवा लुटण्यासाठी सत्ता मिळविण्यासाठी खोटय़ा आश्वासनांची खैरात वाटत आहेत. निवडणूक झाल्यानंतर यांना पुन्हा गाशा गुंडाळून पच्छिम बंगालला जातील यात शंकाच नाही असेही शितल नाईक यांनी सांगितले.