कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सातत्याने फूट पडत आहे. पक्षाचे आणखी एक आमदार अरिंदम भट्टाचार्य भाजपमध्ये सामील होणार असल्याचे समजते. अरिंदम हे शांतिपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी शुभेंदू धिकारी यासारख्या दिग्गज नेत्यानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे भाजप सातत्याने यंदा होणाऱया विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहे. अरिंदम भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसच्या तरुण आणि प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जायचे. परंतु अरिंदम यांनी स्वतःच्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ काँगेसमधून केला होता. वकील असलेले अरिंदम हे पश्चिम बंगाल युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. 2017 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तृणमूल काँग्रेसचा वरचष्मा असताना अरिंदम यांनी काँग्रेसचा उमेदवार म्हणून शांतिपूर मतदारसंघात तृणमूलच अजॉय डे यांना पराभूत केले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अरिंदम हे शांतिपूर मतदारसंघात भाजपला विजय मिळवून देऊ शकतात असे मानले जात आहे.