प्रतिनिधी/ सातारा
सातारा पंचायत समिती मधील गट शिक्षण अधिकारी संजय धुमाळ यांच्यावर शिक्षिकेचा विनयभंग केल्याने फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर छावा क्षात्रवीर सेना आणि तृतीयपंथी संघटनेकडून सोमवारी धुमाळ यांच्या केबीनमध्ये गुलाबाचे फुल ठेवून लग्नाची मागणी करण्यात आली. यावेळी तृतीयपंथी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत वारकर, छावा क्षात्रवीर सेनेचे राज्य प्रवक्ता अरबाज शेख व सदस्य उपस्थित होते.
यावेळी वारकर म्हणाले, ग्रामसेवक, पंचायत समिती अधिकारी, या सरकारी अधिकाऱयाकडून महिलांना शारिरीक सुखाची मागणी होते. यांची खंत वाटते. देशामध्ये ग्रामसभा, लोकसभा, आणि राज्यसभा महत्त्वाच्या वाटतात. अशा ग्रामसभेच्या अधिकाऱयाकडून असा त्रास व्हावा अशी अपेक्षा नाही. आज आम्ही केबीनमध्ये गुलाबाचे फुल ठेवले. त्यांचे कारण की, शरीर सुखाची मागणी महिलांना करता त्यापेक्षा तृतीयपंथीशी लग्न करून सुखाने नंदा, असला अधिकारी आम्ही घरजावई करून घेतो, त्यांचे पालन पोषण करतो. आमच्या लोकांची घरे बसतील. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांचा निषेध जिह्यासह महाराष्ट्रात आणि देशात झालाच पाहिजे. याशिवाय कुठलाही सरकारी अधिकारी असो, आणि त्यांच्याकडे महिलेचे काम असेल. तर त्या ऑफिसमधल्या सरकारी अधिकाऱयांच्या अंतर्गत त्यांच्या कामकाजासाठी शासकीय कामासाठी तेथील महिला असावी. त्या महिलेचे बोलणे त्या महिलेशी व्हावे. त्यासाठी प्रत्येक शाखेमध्ये महिलांशी संवाद साधण्यासाठी महिलांची समिती हवी. याबाबत संबंधित विभागाने लक्ष घालणे गरजेचे आहे.