शनिवारी अभ्यंग स्नानाने दिवाळीच्या मुख्य सणाला प्रारंभ, शहर विद्युत रोषणाईच्या प्रकाशाने उजळले
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळीला दिवा हवा, चैतन्याचा स्पर्श नवा,
आनंद बरसो तुमच्या जीवनी, हीच इच्छा मनोमनी,
आरोग्य समाधानाचा बहर, सदा लाभो निरंतर
दिवाळीच्या पूर्व संध्येपासून सुरू झालेल्या शुभेच्छांच्या देवाणघेवाणीमध्ये आरोग्य समाधानाचा बहर ही शुभेच्छा विशेष महत्त्वाची… कोरोनाने निर्माण केलेली काळजी आता दिवाळीच्या दिपाने भेदावी आणि पुन्हा आरोग्य संपन्न जीवन सर्वांना लाभावे, याच सद्भावनेने दिवाळीच्या तेजोमय सणास प्रारंभ झाला.
पहाटेचे अल्हाददायी वातावरण, सर्वत्र टांगलेले आकाश दिवे, त्यातून पाझरणाऱया प्रकाशाने उजळलेला परिसर, पणत्यांची आरास, सर्वत्र रांगोळीचा कलात्मक आविष्कार अशा आनंददायी आणि उत्साही वातावरणात शनिवारी अभ्यंग स्नानाने दिवाळीच्या मुख्य सणाला सुरूवात झाली.
वसुबारस आणि धनत्रयोदशीनंतर दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजेच नरकचतुर्दशीचा दिवस शनिवारी आला. तेल, उटणे यांचे लेपण करुन अभ्यंगस्नान झाले. तत्पूर्वी पहाटेच उठलेल्या महिलांनी आपल्या घरासमोर आकर्षक अशा रांगोळय़ा रेखाटल्या. फ्लॅट संस्कृतीमध्ये जागा अपुरी ठरली तरी हौस पूर्वी इतकीच आहे. त्यामुळे उपलब्ध जागेतसुद्धा महिला, तरुणींनी आपला कलाविष्कार सादर केला. दिवाळीला घर, दुकान, आस्थापने, कार्यालये स्वच्छ केली जातात. अर्थातच सर्वत्र पणत्यांबरोबरच विद्युतरोषणाईसुद्धा उत्साहात करण्यात आलेली दिसून आली. कार्यालयांमध्ये आणि घरांच्या प्रवेशद्वारावर, अपार्टमेंटवर विद्युत माळा सोडण्यात आल्याने सायंकाळनंतर संपूर्ण शहर पणत्यांच्या, आकाश दिव्यांच्या आणि विद्युत रोषणाईच्या प्रकाशात उजळून निघाले. पहाटे आणि सायंकाळी हे दृष्य मोठे मनोहारी होते.
अभ्यंग स्नान होताच घरोघरी फराळाचे बेत रंगू लागले. स्नान उरकून फराळ करुन मंडळी नेहमी बाहेर पडत. परंतु बहुसंख्य जणांनी घरात राहणे पसंत केले. बऱयाच कुटुंबामध्ये ज्ये÷ांनी बाहेर पडू नये, अशी नम्र विनंती तरुणाईने केली आणि ज्ये÷ांनीसुद्धा विनंती मान्य करून घरी राहणे पसंत केले. अर्थात मोबाईलमुळे समाज माध्यमांवर तरुणाई इतकीच ज्ये÷ मंडळीसुद्धा सक्रिय होती.