ऑनलाईन टीम / हैदराबाद :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तीन मे पर्यंत लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आज पासून काही ठिकाणी गोष्टी शिथिल करण्याच्या तर काही ठिकाणी कठोररित्या राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर तेलंगणा मध्ये मात्र लॉक डाऊनचा कालावधी सात मे पर्यंत वाढवला जात आहे अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केली आहे.
ते म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात लॉक डाऊनला अधिक कठोरपणे राबवण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन जेवण घरोघरी पोहोचवण्यावरही बंदी घालण्यात येत आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितनुसार, तेलंगणा मध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे 18 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 186 जणांना प्रकृती स्थिर असल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 844 वर पोहोचली आहे.