ऑनलाइन टीम / मुंबई :
पंतप्रधान मोदींनी केलेल्या दिवे लावण्याच्या आवाहनावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. ही टीका त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मोदींनी लोकांना टाळ्या वाजवायला सांगितले तेव्हा ढोल वाजवले गेले. दिवे लावायला सांगितल्यावर आता आग लावायला नको, असा टोला राऊत यांनी मोदींना लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, सौर दिवे तर लावून पण ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे हे आम्हाला सांगा. साहेब कामाचा आणि लोकांच्या पोटा पाण्याचं बोला. दरम्यान मोदींच्या या आवाहनानंतर काही जणांनी समर्थन केले. तर काहींनी यावर सडकून टीका केली आहे.