अलतग्यात खळय़ातील भाताला आग लावल्याने शेतकऱयाचे नुकसान
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
भाताची मळणी करण्यासाठी खळय़ात टाकलेल्या भातालाच अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री अलतगा शिवारात ही घटना घडली आहे. या कृत्यामुळे शेतकरी वर्गांतून संतप्त प्रक्रिया व्यक्त होत आहेत. अज्ञात व्यक्तींचा शोध घेवून तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
अनिल यल्लाप्पा पाटील असे भात जळालेल्या शेतकऱयाचे नाव आहे. पाटील कुटुंबीयांनी कापणी केलेले भात सोमवारी दिवसभर मळणीसाठी खळय़ावर जमा केले होते. दरम्यान मळणीसाठी 20 ताडपत्र्याही वापरण्यात आल्या होत्या. मंगळवारी सकाळी पाटील कुटुंबीय मळणीसाठी शिवारात गेले असता हा प्रकार दिसून आला. यामध्ये 15 पोती भात, पिंजर आणि 20 मळणीच्या ताडपत्र्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे पाटील कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
तालुक्मयात शेतकरी सुगी हंगामात मग्न झाले आहेत. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने भाताची जमवाजमव करण्यासाठी धडपड सुरू आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून समाजकंटकांनी आग लावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत संपूर्ण भात जळाल्याने पाटील कुटुंबीयांसमोर खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पिंजर देखील जळाल्याने जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या प्रकाराची पाहणी करून पाटील कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
ऐन सुगी हंगामात भाताचे नुकसान
ऐन सुगी हंगामातच घडलेल्या या कृत्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. तसेच दरवषी तालुक्मयात अनेक ठिकाणी गवतगंजींना आग लागून शेतकऱयांचे नुकसान होत असते. अलतगा येथील भाताला समाजकंटकांनीच आग लावली असून त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. वर्षभर कष्ट करून घेतलेले पिक क्षणात भस्मसात झाल्याने शासनाने तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.