वार्ताहर/ राजापूर
लॉकडाऊनमध्ये राजापूर शहर परिसरात ठिकठिकाणी कार्यरत असणाऱया पोलिसांसह अन्य शासकीय कर्मचाऱयांना तसेच खरेदीसाठी किंवा अन्य महत्वाच्या कामांसाठी शहरात येणाऱया नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी सुभाष उर्फ शुबी चव्हाण यांनी तारा ड्रींकींग वॉटरच्या माध्यमातून शहरात जवळपास 7 ते 8 ठिकाणी थंड पाण्याचे जार ठेवले आहेत. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱयांसह वाटसरूंचीही तहान भागत आहे.
कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जीवानावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. शिवाय खासगी तसेच एसटी वाहतूकही बंद आहे. लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलीस प्रशासन नाक्यानाक्यावर पहारा देत आहेत. त्यामुळे पोलीस व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी येणारे शहर व आजूबाजूच्या परिसरातील किरकोळ ग्राहक वगळता राजापुरात शुकशुकाट आहे.
राजापूर शहर लॉकडाऊन असल्याने कर्तव्यावर असणाऱया प्रशासकीय कर्मचाऱयांना तसेच बाजारात येणाऱया ग्राहकांना चहा तर सोडाच पण पाणी मिळणेही मुश्किल बनले आहे. ही अडचण लक्षात घेऊन तारा ड्रींकींग वॉटरच्या माध्यमातून सुभाष चव्हाण यांनी शहरात ठिकठिकाणी थंड पाण्याचे जार ठेवले आहेत. शहरातील जवाहर चौक, नवजीवन हायस्कूल, आझाद चित्रपटगृह नाका, पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय तसेच मुंबई-गोवा महामार्गावर डेपो व अंकिता हॉटेलसमोर थंड पाण्याचे जार ठेवून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱयांसह वाटसरूंच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.